सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी ३२ फुटांवर गेल्याने नदीकाठच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. शहरातील सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, काका नगर, नवीन बायपास रोड या परिसरातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू झाले आहे. कृष्णा नदीसह वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे नदीकाठावरील १०४ गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सांगली शहरात रात्रीपासून चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. पूरबाधितांसाठी शहरातील शाळा आणि रिकाम्या इमारतींमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे. एनडीआरएफचे एक पथक सांगलीत, तर दुसरे पथक आष्टा येथे तैनात असून, पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम पथकांकडून सुरू आहे. दरम्यान, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी ३२ फुटांवर पोहोचली आहे, तर वारणा नदीही इशारा पातळीवर पोहोचली आहे. वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने वारणा नदीत पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून ५५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सांगलीत पुराचा धोका वाढला आहे. कृष्णा नदीचे पाणी झपाट्याने वाढत असल्याने महापुराच्या पुनरावृत्ती होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापुरातही नद्या तुडुंब
आणि सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असल्यामुळे वारणा राधानगरी आणि कोयना या सर्वच धरणातून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली असून पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे.
गेले दोन दिवस पुन्हा एकदा या दोन्ही जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. रविवारी दिवसभर आणि रात्रभरही पाऊस धो-धो कोसळत होता. धरण क्षेत्रात तर अतिवृष्टी सुरू असल्याने राधानगरीचे चार दरवाजे उघडले आहेत. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून ती आता इशारा पातळी पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे फुल्ल भरल्या आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे 94 बंधारे पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत. अनेक रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे सध्या या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. अति पावसामुळे महापूराची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे नदीकाठावरील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी जावे हे असे आवाहन करण्यात आले आहे
हेही वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
These are actually great ideas in concerning blogging.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.