नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने राज्यातील लोकसभेच्या २२ जागांवर दावा केला असताना, भाजपने ‘मिशन २०२४’वर काम सुरू करून, शिवसेनेच्या १३ खासदारांच्या मतदारसंघांवर संयोजक नियुक्त केले आहेत. भाजपने आज, सोमवारपासून या मतदारसंघांमध्ये ‘मोदी@९’ मोहिमेअंतर्गत जनसंपर्क अभियान सुरू केल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपच्या ‘प्लॅन बी’वरून शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षात न्यायालयाने भरत गोगावलेंची प्रतोद पदावर केलेली नियुक्ती बेकायदा ठरवली आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेची घटना तपासून शिवसेना पक्ष नेमका कोणाचा हे ठरविण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासह शिवसेनेचाही निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यावा लागणार आहे. हा निकाल शिंदे गटाची धाकधूक वाढवणारा आहे. या निकालाने भाजपच्या कोअर गटातही चिंतेचे वातावरण असून, दोन्ही पक्षांतील धूसफूस वाढू लागली आहे.

Gautami Patil : गौतमी पाटीलबाबत छत्रपती संभाजीराजेंनी पहिल्यांदाच मांडले मत; स्पष्टपणे म्हणाले…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला विधानसभेच्या ४८ जागा देणार, असे सांगून वाद ओढवून घेतला होता. शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी तर थेट भाजपकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यातच शिवसेनेने राज्यातील २२ लोकसभा मतदारसंघांवर दावा ठोकल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भाजपनेही आता ‘प्लॅन बी’ तयार केला असून, २०२४मध्ये लोकसभेच्या ४० जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये संयोजकांची नियुक्ती करून, तेथे भाजपची ताकद वाढविण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या १३ खासदारांच्या मतदारसंघांमध्येही ‘वजनदार’ नेते संयोजक नेमण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांवर फुलं उधळायला एवढे जेसीबी लावले,सत्तेचा गर्व चढलाय, अजित पवारांची शंभूराज देसाईंवर सडकून टीका

आम्ही काय करायचे?

भाजपने शिंदे गटाच्या मतदारसंघात संयोजक नेमल्यावरून शिंदे गटाच्या खासदारांमध्ये नाराजीची भावना आहे. ‘आम्हाला विश्वासात न घेताच भाजपने ही कृती केल्याने तणाव निर्माण होऊ शकतो,’ असा दावा एका खासदाराने केला. ‘भाजपचा हा प्रयत्न आम्हाला आव्हान देणारा असल्याचे मत आणखी एका खासदाराने नोंदवले. आम्ही भाजपच्या चिन्हावर कदापि निवडणूक लढवणार नाही,’ असा दावाही या खासदाराने केला आहे.

शिवसेना पदाधिकारी म्हणतात…

– आम्ही अधिक जागा मागू नये यासाठीच संयोजक नियुक्तीची खेळी.

– हा निव्वळ दबावतंत्राचा भाग.

– विधिमंडळ किंवा न्यायालयात गडबड झाल्यास भाजपच्याच चिन्हावर लोकसभा लढवावी लागणार.

असे आहेत संयोजक

नाशिक : प्रा. देवयानी फरांदे, शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील, पालघर : संजय केळकर, नरेंद्र पवार, हातकणंगले : सुरेश हळवणकर, कोल्हापूर : धंनजय महाडीक, यवतमाळ-वाशिम : मदन ऐरावार, दक्षिण मध्य मुंबई : प्रसाद लाड, उत्तर पश्चिम मुंबई : अमित साटम, मावळ : संजय भेगडे, बुलढाणा : डॉ. संजय कुटे, कल्याण : रवींद्र चव्हाण, रामटेक : अरविंद गजभिये, हिंगोली : रामराव वडकुते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here