वाशिम : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सीबीलच्या कारणावरुन पीक कर्ज नाकारल्यानं बँकांच्या अधिकाऱ्यांना झापलं होतं. फडणवीसांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्याचं उदाहरण दिलं होतं. उपमुख्यमंत्र्यांना कडक इशारा देऊन देखील परिस्थितीमध्ये काही फरक पडला नसल्याचं चित्र आहे. खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ९८८ शेतकऱ्यांना एकूण १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, बँकांच्या वेगवेगळ्या जाचक अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज मिळाले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक कर्ज नाकारल्यास बँकांवर कारवाई करू, अशी केलेली घोषणा हवेतच विरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असताना बँकांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास विलंब होत आहे. त्यात पीक कर्जासाठी सीबीलची घातलेली अट जाचक ठरत आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. याविषयी नुकताच अकोल्यात मोठा मोर्चाही शेतकऱ्यांनी काढला होता.
प्रिय राहुल गांधी, माझ्या आजोबांना मंत्री का केलं नाही? ते खूप काम करतात..७ वर्षांच्या नातीचं भावनिक पत्र
आता वाशिम मध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती विदर्भ प्रमुख दामुअण्णा इंगोले यानी दिली आहे. तर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे यांनी सांगितले की, अनेक शेतकऱ्यांना विविध कारणाने पीक कर्ज नाकारले जात आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी आमच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रं घेऊन आम्ही संबंधित बँकेची लेखी तक्रार जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकाकडे करणार आहोत. बँका शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक देत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे, असंही ते म्हणाले.
सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकरांचा पुतळा हटवण्यावरुन राजकीय गदारोळ, छगन भुजबळांची संतप्त प्रतिक्रिया
बँकांना कर्जाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले असतांना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. शेतकऱ्यांना बँकेत चकरा माराव्या लागत असून कर्जासाठी तारीख पे तारीख मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने खरीप हंगाम पूर्वी मशागत, बी- बियाणे खरेदी कसे करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे जिल्हा अग्रणी बँकेने लक्ष देण्याची गरज आहे.

Weather Alert : राज्यासाठी पुढचे ४८ तास धोक्याचे, मुंबईसह या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here