मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे काढून घेण्याची घोषणा केली. यासोबतच गुलाबी नोटा बदलून घेण्यासाठी केंद्रीय बँकेने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली. आता रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला मुद्दा बनवून विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका टिप्पणीत म्हटले होते की २,००० रुपये जारी करणे आणि आता ते काढून घेणे या तमाशाने भारतीय चलनाच्या स्थिरतेबद्दल शंका निर्माण केली आहे. आता त्यांच्या या वक्तव्याला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

निर्मला सीतारामन यांचे चिदंबरम यांना प्रत्युत्तर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माजी अर्थमंत्र्यांना फटकारले आणि PTI च्या आवल्यानुसार म्हटले की, माजी अर्थमंत्र्यांनी अशा प्रकरणांमध्ये केंद्रीय बँकेच्या निर्णयावर आक्षेप घेणे चांगले नाही. सीतारामन म्हणाल्या की मी मंत्रालयासोबत आहोत. “UPA सरकारमध्ये, जे १० वर्षे टिकले, ते अर्थमंत्री होते. आम्ही संसदेत अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि आम्हाला त्याची ठोस उत्तरे कधीच मिळावी नव्हती,” मुंबईत पत्रकार परिषदेत सीतारामन म्हणाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, परिस्थिती समजून घेणे आपल्या सर्वांसाठी चांगले होईल. आरबीआयने घेतलेल्या निर्णयानुसार टिप्पणी करा आणि अनावश्यक टिप्पण्या टाळा.

2000 Notes Exchange: पोस्टात २००० रुपयांच्या नोटा बदलता येतील का? वाचा बातमी तुमच्या कामाची
आर्थिक वाढीची शक्यता कमी

पी. चिदंबरम यांनी २००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर त्यांनी म्हटले की, २००० रुपयांची नोट चलनात आणणे आणि त्यानंतर ती काढणे यामुळे भारतीय चलनाची अखंडता आणि स्थिरता यावर शंका निर्माण झाली आहे. त्यांनी असेही म्हटले की आघाडीचे आर्थिक निर्देशक घसरणीकडे निर्देश करत आहेत आणि अर्थव्यवस्थेला आणखी बळ मिळेल असा विश्वास नाही.

नोटाबंदीच्या काळात रावसाहेब दानवेंनी नोटा बदलून दिल्या होत्या, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

Rs 2000 Withdrawn: दोन हजारच्या नोटा कॅश देऊन लोक खरेदी करत आहेत ही गोष्ट; सरकार झाले अलर्ट, नियमात केला बदल
२००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद
रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेत नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, तर बँक शाखांमध्ये जाऊन खात्यात जमा किंवा बदली करून घेऊ शकतात. मात्र, आरबीआयने यासाठी मर्यादा निश्चित केली असून त्यानुसार एकावेळी २००० रुपयांच्या १० नोटा बदलता येतील. म्हणजेच, एखादी व्यक्ती एका वेळी जास्तीत जास्त २०,००० रुपये बदलू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here