Nagpur Chicks Hatched From The Eggs Due To Rising Temperature : विदर्भात तापणान वाढले आहे. याचा परिणाम नागरिकांवर होत आहे. पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाढत्या तापमानामुळे अंड्यातून पिल्ल बाहेर येत असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आला आहे.

 

नागपूर : नागपूर आणि विदर्भात उन्हाळा साधारणपणे तीव्र असतो. मात्र, यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या पुढे आहे. त्याचे मानवावरच नाही तर निसर्गावरही गंभीर परिणाम होत आहे. हे सिद्ध करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तापमानामुळे टेम्पोमध्ये नेल्या जाणाऱ्या कोंबडीच्या अंड्यातून पिल्ले बाहेर येताना दिसत आहे.मुळात, पिल्ले अंड्यातून बाहेर येण्यासाठी उब मिळणे आवश्यक असते. मात्र, असामान्य तापमानामुळे पिल्ले उब न घेता अंड्यातून बाहेर पडत आहेत. काल दुपारी असाच प्रकार नागपूरहून भंडारा जाणाऱ्याला अंडे वाहतूक करणाऱ्या वाहनात घडला. हा व्हिडिओ नागपुरातील महामार्ग पोलिसांनी शूट केला आहे. अंडे वाहतूक करणारे वाहन नागपूरहून भंडारा येथील हॅचरीकडे जात असताना ही घटना समोर आली आहे. ते काहीही असले तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
फ्लॅट माझ्या नावावर करा, पोटचं पोर जन्मदात्यांना संपवायला निघालं, जीव मुठीत घेऊन बाप धावला
नागपुरातील पारा यंदा तीनवेळा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. नागपुरात यंदा तापमानाने विक्रम मोडला नसला तरी उष्णतेच्या दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे चित्र एकट्या नागपूरचे नाही. हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग यावर शास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. परंतु अलिकडच्या काळात जगभरात तापमानात वाढ झाली आहे. आणि आता तापमानात झालेली ही वाढ सामान्य नाही, यावर सर्वांचे एकमत आहे.
Accident News: लग्नाहून घरी येताना कारचा टायरच फुटला, आईचा जागीच मृत्यू तर मुलगा अन् सून जखमी
उष्णतेची ही स्थिती केवळ भारत, पाकिस्तान किंवा सौदी अरेबियामध्ये नाही. जगभरातील अनेक देशांना यंदा तीव्र उष्णतेच्या प्रकोपाचा सामना करावा लागला आहे. उत्तरेकडील देशांमध्येही यंदा तापमानात वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार आर्क्टिक समुद्रातील ९५ टक्के जुना आणि प्रचंड जाडीचा हिम नाहीसा झाला आहे. उष्णतेच्या लाटेमागील मुख्य कारण म्हणजे निसर्गातील मानवी हस्तक्षेप म्हणजे प्रदूषण आणि जंगलतोड ही आहे. हा बदल निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे होत असल्याचा दावा करणारे विविध शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here