Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. कोस्टल रोड यंदाच्या डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचं शिंदे म्हणाले.

 

हायलाइट्स:

  • एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी
  • देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती
  • कोस्टल रोड डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :‘पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबईकरांना वर्दळीच्या प्रसंगी वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, आता मुंबईकरांची यातून सुटका होणार आहे. मुंबई किनारा रस्ता (मुंबई कोस्टल रोड) या वर्षाअखेरीपर्यंत कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. भविष्यात किनारी रस्त्याला मुंबई पारबंदर प्रकल्पापर्यंत जोड दिली जाईल आणि इतर विविध रस्त्यांनाही हा प्रकल्प जोडून मुंबईकरांचा प्रवास सुलभ करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई ते रायगड जलद प्रवास शक्य होणार असल्याचे शिंदे म्हणाले.

मुंबई महापालिकेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा भाग असलेल्या भूमिगत बोगद्याचा ‘ब्रेक-थ्रू’ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. ‘नेपियन सी रस्ता परिसरात प्रियदर्शनी पार्क येथे हा सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘ब्रेक-थ्रू’ होताच याठिकाणी उपस्थित मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी जल्लोष केला.
Vande Bharat Express : कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: वंदे भारतला अखेर मुहूर्त मिळाला, असं असेल वेळापत्रक
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत पुढील टप्प्यात दहिसर-मिरा-भाईंदरची जोडणी तयार होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना एकूण ३२ किलोमीटरचा सागरी किनारी मार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ‘मुंबई पारबंदर प्रकल्पालाही या किनारी मार्गाची जोड दिल्याने वांद्र्यातून थेट रायगडला जाण्याचा पर्याय मिळणार आहे. परिणामी मुंबईतील वाहतूककोंडी दूर होऊन जलद गतीने प्रवास करता येणार आहे’, असे शिंदे यावेळी म्हणाले. ‘किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत ‘मावळा’ या बोगदा खनन संयंत्र अर्थात टनेल बोरिंग मशिनने (टीबीएम) मावळ्यासारखी कामगिरी करत डोंगर भेदून गड सर केला’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ब्रेक-थ्रू’च्या कार्याचे कौतुक केले.
खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोऱ्यात अंत्यसंस्कार , लढाऊ नेत्याच्या आकस्मिक निधनाने धक्का

१५ मिनिटात एक मीटर

किनारी रस्ता निर्मितीसाठी ‘मावळा’ हे बोगदा खनन संयंत्र वापरले आहे. सुमारे १२ मीटर व्यासाच्या ‘मावळा’ने अवघ्या १५ मिनिटांत ‘ब्रेक-थ्रू’ करत खनन पूर्ण केले. बोगद्यातून ‘मावळा’ बाहेर येताच उपस्थितांसह अभियंता, अधिकारी आणि सर्व बांधकाम कामगारांनी जल्लोष केला. हाती तिरंगा घेत त्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’चा जयघोष केला.
मुंबईत मोदींच्या हस्ते झालेल्या उद्घाटन सोहळ्यात पैशांचा चुराडा; एका दिवसात BMCचे ८ कोटी खर्च

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here