मुंबई: नांदेड शहरात मनसेची धुरा वाहणारे शहराध्यक्ष यांच्या आत्महत्येवर अध्यक्ष यांनी अत्यंत भावनिक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. सुनील ईरावर यांना श्रद्धांजली वाहतानाच माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका, अशी कळकळीची विनंतीच राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना केली आहे. ( ‘s emotional post on )

वाचा:

राज यांनी सुनील ईरावर यांना वाहिलेली श्रद्धांजली अत्यंत भावनिक आहे. ‘संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही आणि उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं’, असे सुरुवातीलाच नमूद करत संघर्षाला सोबती बनवण्याचा संदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला.

वाचा:

सुनील ईरावर यांनी आत्महत्या करण्याआधी राज यांना उद्देशून सुसाइड नोट लिहिली आहे. ‘साहेब जात आणि पैसा हे दोन्ही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणं यापुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा’, असे या सुसाइड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचा उल्लेख करत राज यांनी मनसेच्या स्थापनेमागचा उद्देश नव्याने स्पष्ट केला आहे. ‘अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे. म्हणूनच ९ मार्च २००६ रोजी आपण हा पक्ष सुरू केला. नवनिर्माणाच्या आपल्या या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच १४ वर्षे आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सर्वात जास्त दमछाक होते. त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही, असे राज यांनी पुढे नमूद केले आहे.

वाचा:

मी ह्या आधी देखील सांगत आलो आहे आणि आता पुन्हा सांगतो, हा या जातीचा…त्या मतदारसंघात अमूक जातीची इतकी मतं आहेत…ह्या उमेदवाराकडे पैसा ओतायची इतकी ताकद आहे…असल्या गोष्टीत मला स्वारस्य नाही, मला माझ्या पक्षाचं राजकारण असल्या गोष्टींवर चालवायचं नाही, यश जेव्हा यायचे असेल तेव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल, अशा भावनाही राज यांनी व्यक्त केल्या.

सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की, माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका, असे कळकळीची विनंती राज यांनी कार्यकर्त्यांना केली. करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे. ह्या काळात स्वत:ची आणि स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घ्या, असे आवाहनही राज यांनी केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here