मुंबई पोलिसांचा संपूर्ण जगात नावलौकिक आहे. मात्र तरीही या पूर्वी अनेक प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असा अर्थ कोणी काढू नये. सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या मुंबई पोलीस करीत असलेल्या चौकशीत मुंबई पोलिसांच्या नावलौकिकाला न शोभणारी संथगती आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन सारख्या महान कलाकाराला सुरुवातीच्या काळात काम मिळत नव्हते. त्यांना खूप संघर्ष करावा लागला. बॉलिवूडमध्ये काही प्रमाणात कलाकारांना चांगला वाईट अनुभव येत असतो. सुशांतसिंहवरही अन्याय झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुशांतसिंह मृत्यूची सीबीआय चौकशी होणे योग्य असून यात कोणतेही राजकारण नाही, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सुशांताचा मृतदेह आढळून आला होता. त्यानं आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं होतं. परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या, असं असलं तरी सुशांतचा मृत्यून नेमका कसा झाला याचं कोडं आजही उलगडू शकलं नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times