रायगड : किल्ले रायगडावर १ ते ६ जून या कालावधीत ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र सरकारनं आज तिथीप्रमाणं शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री उदय सामंत, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठी घोषणा केल्या.

एकनाथ शिंदे यांनी प्रतापगड प्राधिकरण निर्माण करण्याची घोषणा केली. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी प्राधिकरण निर्माण करणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. त्याच्या अध्यक्षपदी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे असतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी यानंतर मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली होती.
अद्भुत! फक्त ४६ मिनिटांत ह्रदय दक्षिण मुंबईतून बेलापुरात, ४० वर्षीय व्यक्तीला मिळाले जीवदान
महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केलेल्या मागणीनुसार एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या पायथ्याला शिवसृष्टी उभारण्यासाठी निधी देण्याची घोषणा केली. रायगडच्या पायथ्याला ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटींची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
Weather Alert : पावसाचा लपंडाव, राज्यात ३ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा; तर या जिल्ह्यात कोसळणार पाऊस
मी शेतकऱ्याचा आणि कष्टकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कारभार करतोय याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या सरकारनं जसं शिवाजी महाराज कष्टकरी शेतकऱ्यांच्या मागं उभं राहायचं. आपल्या सरकारनं शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याची योजना केलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणं आपल्या राज्यसरकारनं देखील नमो शेतकरी सन्मान योजना ६ हजार रुपयांची आपण जोडली आहे. ही तरतूद देवेंद्र फडणवीस यांनी केलं, हे शेतकऱ्यांसाठी आहे. सिंचन वाढीसाठी आपल्या सरकारनं अनेक निर्णय घेतले. जलयुक्त शिवार योजना आम्ही पुन्हा सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य गोर गरीब रयतेचं राज्य होतं. त्यांनी जातीभेद केला नाही, शिवाजी महाराजांनी महिलांना पुढं येण्याची संधी दिली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Maharashtra SSC Result 2023: महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर, एकूण ९३.८३ % विद्यार्थी उत्तीर्ण

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here