बालासोर : ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्याती बहानगा गावाजवळ झालेल्या रेल्वे अपघातानं संपूर्ण देश सुन्न झाला आहे. या अपघातात आतापर्यंतच्या माहितीनुसार २३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. दोन एक्स्प्रेस आणि एक मालगाडी अपघातग्रस्त झाल्यानं हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. प्राथमिक माहितीनुसा हा अपघात बालासोर स्टेशन जवळील बहानगा बाजार स्टेशनच्या जवळ झाला. अपघाताच्या वेळी मालगाडी आउटर लाइनवर उभी होती. कोरोमंडल एक्स्प्रेस १२८४१ ही शालिमारहून चेन्नईला निघालेली होती. ही रेल्वे बहानगा बाजार स्टेशनच्या पूर्वी ३०० मीटरवर डिरेल झाली. ही दुर्घटना इतकी भीषण होती की कोरोमंडल एक्स्प्रेसचं इंजिन मालगाडीच्या डब्यावर गेलं होतं एक्स्प्रेसचे इतर डबे दुसऱ्या ट्रकवर गेले होते. त्याच ट्रॅकवरुन हावडा बंगळुरु एक्स्प्रेस १२८६४ निघाली होती. त्या एक्स्प्रेसची धडक कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांना बसली.

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार लागोपाठ धमाक्याचे आवाज येत होते. एकापाठोपाठ धमाक्याचे आवाज येत होते. यानंतर घटनास्थळी पाहिलं तर रेल्वेचे डबे रुळावरुन घसरली होती.

कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरु हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या अपघाताबद्दल प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार कोरोमंडल एक्स्प्रेसचे कोच बी २ ते कोच ९ पलटले होते. तर ए १ आणि ए २ कोच ट्रॅकवर आडवे पडलेहोते. तर बी १ इंजिनसह रुळावरुन घसरलं होतं. कोच १ आणि जीएस कोच ट्रॅकवर होता. यामुळं मृतांमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसमधील मृतांची संख्या अधिक असू शकते.
Pankaja Munde : राज्याचं लक्ष लागलेली भेट झाली, पंकजा मुंडे एकनाथ खडसेंची बंद दाराआड चर्चा, काय ठरलं?

बंगळुरु हावडा एक्स्प्रेसचं नुकसान

बंगळुरु हावडा एक्स्प्रेसचं १२८६४ देखील नुकसान झालं आहे. या एक्स्रप्रेसचा जनरलचा डबा दुर्घटनाग्रस्त झाला. तरस मागील बाजूनं जनरल सिटींग आणि दोन कोच रुळावरुन उतरले आणि पलटी झाले. कोच १ पासूनचे इंजिनपर्यंतचे इतर डबे रुळावर होते. या दुर्घटनेची चौकशी ए.एम. चौधरी (सीआरएस/एसई सर्कल) करणार आहेत. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Odisha Railway Accident :…तर २३८ जणांचा जीव वाचला असता; रेल्वे दुर्घटनेतील एक चूक आणि देशभरातील नागरिकांचा संताप
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेरहामपूर मधील पीयूष पोद्दार या अपघातातून बचावेल आहेत. ते कोरोमंडल एक्स्प्रेसमधून तामिळनाडूला निघाले होते. अपघाताबद्दल सांगताना ते म्हणतात की पहिल्यांदा आम्हाला धक्का बसला आणि आमचा डबा वळता दिसला. आमचा डबा रुळावरुन घसरत होता. आम्हाला एक धक्का बसला आणि आमच्यामधील काही जण डब्या बाहेर फेकलो गेलो. त्यावेळी आमच्या जवळपास चार ते पाच मृतदेह पडले होते, असं त्यांनी सांगितलं. तिथूनचं रांगत रांगत आम्ही बाहेर पडलो, असं पीयूष पोद्दार यांनी सांगितलं.

सुरक्षा कवच शिवाय धावली ट्रेन! ओडिशातील भयावह रेल्वे दुर्घटनेतील धक्कादायक अपडेट समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here