वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : ‘भारतात सध्या दोन स्वतंत्र विचारधारांचा संघर्ष सुरू असून, देशाला पर्यायी दिशा दाखवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील,’ असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी भारतीय अमेरिकी समुदायासमोर व्यक्त केला. वॉशिंग्टनमधील दोन दिवसांच्या भेटीची सांगता करताना राहुल यांनी या संवादाने केली. काँग्रेसेतर विरोधकांशी जेव्हा भेटी होतात, तेव्हा एकत्र येऊन लढण्याच्या आवश्यकतेवरच मी भर देतो, असे त्यांनी नमूद केले.

‘माध्यमांतील अनेक जण भाजप आणि संघाची प्रतिमा प्रत्यक्षाहून मोठी दाखवतात. मात्र, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील निकालाकडे पाहा. आता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्येही काँग्रेसची लढण्याची आणि भाजपला पराभूत करण्याची क्षमता सिद्ध होईल,’ असे राहुल यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

सकारात्मक चर्चा

‘आम्ही नेहमी आम्ही एकत्र येण्याची भाषा करतो, पण प्रत्यक्षात पक्ष म्हणून स्वतंत्र लढतो. पण भारताला पर्यायी दिशा दाखवण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून त्यावर विचार केला, तर फरक दिसेल. सध्या सर्व विरोधी पक्षांमध्ये मंथन सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चा प्रभावी आणि सकारात्मक आहेत,’ असेही राहुल गांधी या वेळी म्हणाले.
भाजपला लोकसभेला किती जागा मिळणार? माजी केंद्रीय मंत्र्यानं आकडा सांगितला, कारणही सांगितलं

विचारसरणींची लढाई

‘सध्या भारतात दोन विचारधारांची, दृष्टीकोनांची लढाई सुरू आहे. त्यातील एक महात्मा गांधी यांनी दाखवलेला शांतता, अहिंसा, सत्याचा मार्ग आहे. धर्म, जाती, प्रांत, भाषेच्या भेदापलीकडे जाऊन आपल्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये समान सहभाग नोंदवण्याचा हा विचार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःच्या भावना मांडण्याची मुक्तता असेल, असा तो दृष्टीकोन आहे. ‘दुसरीकडे अवैज्ञानिक आक्रमकतेवर आधारलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन आहे. ही लढाई नवी नाही. या विचारांतील लढाई हजारो वर्षांपासून सुरू असून, महात्मा गांधी यांचा दृष्टिकोन यशस्वी होईल, हा विश्वास मला आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले.
Pune News: पुण्यात मोठा प्रकल्प येणार, बड्या कंपनीचा शिंदे-फडणवीस सरकारसोबत कंपनीचा करार, नोकऱ्यांची संधी
भाजपने सर्व संस्था काबीज केल्या आहेत. माध्यमे त्यांच्या हातात आहेत. सर्व संस्थांवर ते दबाव आणत आहेत. लोकांना धमकावत आहेत. तरीही आपुलकी आणि विचारांचा आवाज दबला जाऊ शकत नाही. देशातील प्रेमाचा आवाज दबणार नाही. तो अत्यंत शक्तिशाली आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

Mumbai News: ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा, लाडू बनवण्याचा अनधिकृत कारखाना; सिद्धिविनायक मंदिराला नोटीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here