भागलपूर : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल आज रविवारी कोसळला. वर्षभरापूर्वी याच पुलाचा एक एक स्लॅबही कोसळला होता. खगरियाच्या अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर हा पूल बांधला जात आहे. पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याचाच परिणाम म्हणून आज हा पूल गंगा नदीत पडला असा आरोप केला जात आहे. पुलाचे तीन खांबही नदीत बुडाले. आता या घटनेची चौकशी करण्याची घोषणा बिहार सरकारने केली आहे.या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल गेल्या वर्षीही पडला होता. या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट एसपी सिंगला कंपनीकडे देण्यात आलेले आहे. २०१४ मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती. २०१५ पासून पुलाचे बांधकाम सुरू झाले. आजच्या दुर्घटनेपूर्वी देखील हा पूल गंगा नदीत पडला आहे.
संध्याकाळी सातच्या सुमारास कोसळला पूल
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अगुवानी-सुलतानगंज मार्गावर गंगा नदीवर पूल बांधण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा पूल अचानक कोसळला. अपघात झाला तेव्हा काम थांबले होते. त्यामुळे पुलावर मजूर नव्हते. हा पूल पत्त्याच्या बंगल्यासारखा गंगेत पडल्याने नदीच्या पाण्याच्या अनेक फूट उंच लाटा उसळल्या. रस्त्याच्या कडेला बसलेले लोक घाबरले. स्थानिक लोकांनी पूल कोसळण्याच्या घटनेचा व्हिडिओ बनवला.
संध्याकाळी सातच्या सुमारास कोसळला पूल
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अगुवानी-सुलतानगंज मार्गावर गंगा नदीवर पूल बांधण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा पूल अचानक कोसळला. अपघात झाला तेव्हा काम थांबले होते. त्यामुळे पुलावर मजूर नव्हते. हा पूल पत्त्याच्या बंगल्यासारखा गंगेत पडल्याने नदीच्या पाण्याच्या अनेक फूट उंच लाटा उसळल्या. रस्त्याच्या कडेला बसलेले लोक घाबरले. स्थानिक लोकांनी पूल कोसळण्याच्या घटनेचा व्हिडिओ बनवला.
सीएम नितीश कुमार यांनी २०१४ मध्ये केली होती पायाभरणी
या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट एसपी सिंगला कंपनीकडे आहे. सन २०१४ मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती. सन २०१५ पासून पुलाचे बांधकाम सुरू झाले होते.