जालना : जालना जिल्ह्यात आज रविवारी दुपारी एकच्या सुमारास रिमझिम पाऊस पडला त्यानंतर तुफान वादळ-वारे वाहू लागले. या वाऱ्याचा वेग भयंकर असल्याने रस्त्यांवरील झाडे मुळापासून उन्मळून पडली. जालना जिल्ह्यातील काही भागात शेतातील विद्युत पुरवठा करणारे खांब कोसळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. पाऊस रिमझिम स्वरूपाचा झाल्याने निर्माण झालेल्या उकाड्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.जालना, मंठा, परतूर, अंबड, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन सह घनसावंगी तालुक्यातील अनेक भागात असेच चित्र निर्माण झाले आहे.जाफराबाद तालुक्यात तासभर वादळी वारा व ढगाळ वातावरणाने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले. आकाशात धुळीचे लोट दोन किलोमीटर अंतरावरून दिसत होते. गेल्या हंगामात अवकाळीने शेतकऱ्यांचे रब्बी पीक उभे पिकआडवे झाले. गहू, हरभरा, मक्का, पावसामुळे काळपट पडले. आजही दीड वाजेच्या सुमारास भर ऊन असताना अचानक वादळी वारा सुरू झाला.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना, भागलपूरमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला, गंगा नदीवर बांधला जात होता पूल
वाऱ्याचा वेग इतका होता की ग्रामीण भागात बऱ्याच घरांवरील पत्रे उडाले. जनावरांचे गोठे पडले, रस्त्यावरील होर्डिंग्ज व झाडे जमीनदोस्त झाली. जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णीसह परिसरात दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातारण तयार झाले होते. व नंतर २ वाजेच्या सुमारास वादळीवाऱ्याने झाडासह लाईट चे पोल देखील आडवे केलेले बघायला मिळत आहे. सध्या स्थितीत परिसरातील शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू असून नागरणी, वखर पाळी, रोट्याव्हेटर सह पेरणी पूर्व मशागतीची आदी कामे सुरू आहे.

अशातच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याची तारांबळ उडाली होती. यावेळी शेतातील जनावरांचा चारा, भुसावरील ताडपत्री, गोठ्यावरील पत्रे, शेतातील मिरची लागवडीसाठी आंथरण्यात आलेली मलचींग इत्यादी वास्तूची दाणादाण उडाली आहे.

आमदार शशिकांत शिंदेना मोठा धक्का; ऋषिकांत शिंदे यांचा शिवसेना प्रवेश, जावळीत राजकीय भूकंप

traffic on samriddhi highway was disrupted

समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी

समृद्धी माहामार्गावर कमान कोसळली, वाहतुकीचा झाला खोळंंबा

समृद्धी महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळबा झाला आहे.जालन्यात वादळी वाऱ्यामुळं समृद्धी महामार्गावरील कमान कोसळल्याची घटना घडली आहे.आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जालना जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल झाल्याने वादळी वाऱ्याला सुरुवात झाली.या वेगाच्या वाऱ्यामुळे समृद्धी महामार्गावरील कमान तुटून पडल्यामुळे समृद्धी महामार्ग बंद झाला असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत त्यामुळे वाहन धारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नातेवाईकाने उचलले टोकाचे पाऊल, कारण समजताच लोक हळहळले
या घटने नंतर अजून कुठला खोळंबा होऊ नये यासाठी समृध्दी वरील पोलिस पथकाने दक्षता घेतली आहे.पोलिसांनी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कमाल हटविण्याचे काम सुरू केले आहे. ही कमान अवजड असल्याने ही कमान हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आला आहे.परंतु या सगळ्या कामामुळे वाहनांच्या लांबच रांगा लागल्या असून काय झाले हे बघण्याच्या उत्सुकतेने प्रवासी वाहनातून बाहेर पडून रस्त्यावर आले आहेत. अनेक जण वाहतुकीची कोंडी कशी फोडता येईल, याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यावर वाहनचालक आणि प्रवासी जमल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here