त्याने नोकरीसाठी घर सोडले पण जिथे पोहोचण्यासाठी तो घरातून निघाला तिथे पोहोचलाच नाही. बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात ललित गंभीर जखमी झाला होता. जेव्हा त्याला रेस्क्यू करण्यात आलं तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. कदाचित त्याला त्याचा मृत्यू समोर दिसत होता. म्हणून त्याने बचावकर्त्याला सांगितलं की कृपया माझं माझ्या लहान भावाशी बोलणं करुन द्या.
त्यानंतर बचावकर्त्याने तत्काळ ललितचा मोबाईल शोधण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्याचा मोबाईल सापडला आणि ललितचा भाऊ मिथुन ऋषिदेव याला फोन लावण्यात आला. पण, ललित आपल्या भावाशी काहीच मिनिटं बोलू शकला. त्यानंतर त्याचा तिथेच मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूची बातमी समजताच मिथुन ढसाढसा रडू लागला. या घटनेने त्याच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.
ललितचा मृतदेह सापडला नाही
भावाचा मृतदेह घेण्यासाठी मिथुन रविवारी कुटुंबासह बालासोरला पोहोचला. तेव्हा ललितचा मृतदेह शोधण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. ललितचा मृतदेह कुठे आहे हे त्यांना कळत नव्हतं. इतक्या मृतदेहांमध्ये ललितचा मृतदेह शोधणे फार कठीण होते. अखेर काही वेळाने ललितचा मृतदेह सापडला. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.
रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू
ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी तीन गाड्यांच्या झालेल्या भीषण धडकेत आतापर्यंत २८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. बचाव आणि मदत कार्यानंतर, रेल्वेने शनिवारी रात्रीच रुळांवरचा बहुतांश ढिगारा हटवला असून लवकरच ट्रॅक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १००० हून अधिक कर्मचारी सतत काम करत आहेत.
prednisone 30 mg https://prednisonepills.pro/# – prednisone for sale no prescription