म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. राधानगरी धरणाचे दोन दरवाजेही बंद झाले आहेत, तरीही पंचगंगा नदीचे पाणी अजून इशारा पातळीवरून वाहत असल्यामुळे पुराचा धोका कायम आहे. शनिवारपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला होता. रविवारी आणि सोमवारी तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. धरण परिसरात तर धोधो पाऊस पडल्यामुळे राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले.

मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. धरण क्षेत्रातही पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद झाले आहेत. सध्या केवळ दोनच दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी पंचगंगा नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली होती. आज पाण्याची पातळी वाढली नसली तरी ती कमी झाली नाही. त्यामुळे अजूनही धोका कायम आहे. संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन प्रयाग चिखली, आंबेवाडी यासह अनेक गावातील लोकांनी कालच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले.

वाचाः

आज दिवसभर पाऊस कमी असल्याने जनजीवन सुरळीत झाले आहे. अजूनही जिल्ह्यातील बहुसंख्य नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अद्याप ८५ धरणे पाण्याखाली आहेत. काही रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नरसिंह वाडी येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली बुडाले आहे. येथील काही घरात पुराचे पाणी घुसले असून मिठाई दुकानदारांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचा जोर ओसरला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत घट न झाल्याने महापुराचा धोका अजूनही कायम आहे.

वाचाः

वाचाः

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here