मुंबई : सध्या महागडे कर्ज आणि महागड्या ईएमआयमुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो रेट कमी करावा, जेणेकरून कर्जावरील व्याजदर थोडे खाली येतील अशी कर्जदारांची अपेक्षा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक ६ जूनपासून (मंगळवार) सुरू होत आहे. ही बैठक ८ जूनपर्यंत चालणार असून आरबीआय गव्हर्नर ८ जून रोजी रेपो रेटची घोषणा करतील. एमपीसीच्या बैठकीत आरबीआय यावेळीही व्याजदर वाढवण्याचे टाळू शकते. याचे कारण म्हणजे काही काळापासून महागाईचा दर लक्षणीयरित्या खाली आला आहे.

आरबीआय काय निर्णय घेणार?
इकॉनॉमिक टाइम्सच्या सर्वेक्षणानुसार, सहा सदस्यीय पॅनेल रेपो दर ६.५० टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवू शकते. पहिल्या बैठकीतही एमपीसीने रेपो दरात कोणताही बदल केला नाही.

RBI Coin Deposit Rule: बँक खात्यात एकाच वेळी किती नाणी जमा करू शकता? नियम जाणून जागरूक व्हा!
व्याजदरात २.५% वाढ
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे भारतातील महागाईचा दरही वाढला. महागाई वाढली तेव्हा आरबीआयने मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान रेपो रेट २.५% वाढवला आहे. गेल्या वर्षभरापासून महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दर वाढवत असून एप्रिलच्या बैठकीत आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नव्हता.

महागाई ४.७% वर
रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वी वाढवलेल्या दरांचा परिणाम आता दिसू लागला आहे. महागाई दरावर नियंत्रण दिसून येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई एप्रिलमध्ये ८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. एप्रिलमध्ये महागाई दर ४.७% नोंदवला गेला, जो आरबीआयच्या सहन करण्यायोग्य पातळीच्या आत आहे. त्यामुळे आरबीआय सध्याचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते, असे मानले जात आहे.

RBI Governor Salary: ज्यांच्या स्वाक्षरीशिवाय नोटा छापल्या जात नाहीत, वाचा RBI च्या गव्हर्नरांचा महिन्याचा पगार
ग्राहकांना किती दिलासा?
अनेक तज्ज्ञांनी याबाबत आधीच सांगितले आहे की, जगभर अनिश्चिततेची परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या दर कपातीची अपेक्षा नाही. डीबीएस बँक इंडियाच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राधिका राव यांनी सांगितले की, मजबूत जीडीपी डेटा आरबीआयला रेपो रेट अपरिवर्तित ठेवण्यास प्रवृत्त करेल. रेपो दर असाच राहिला तर कर्जाच्या सध्याच्या व्याजदरातून सवलत मिळणार नाही, पण त्यात वाढही होणार नाही. त्याचबरोबर आगामी काळात व्याजदरात घट होण्याची शक्यता आहे.

आम्हाला ग्राहकांच्या पैशाची चिंता, तो सुरक्षितच राहिला पाहिजे; RBI ने बँकांना दिली कडक शब्दात समज
बँक ऑफ बडोदाचे अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, यावेळी आरबीआय दर स्थिर ठेवेल अशी अपेक्षा आहे. रेपो दर ६.५% वर स्थिर राहील. एप्रिलमध्ये महागाईचा दर ५% खाली होता आणि मे महिन्यात महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी केलेल्या वाढीचा परिणाम दिसून येत आहे, त्यामुळे आता दर वाढवण्याची गरज नाही. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी दर या पातळीवर ठेवणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here