नागपूर : उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भातील उन्हाळा सामान्यतः जास्त प्रमाणात उष्ण असतो. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. उन्हाचा तडाखा केवळ माणसांनाच नव्हे, तर जनावरांनाही बसत आहे. ही गोष्ट अधोरेखित करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.एका टेम्पोत कोंबडीची अंडी नेत असतानाच अंड्यातून पिल्लं बाहेर येत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून विदर्भातील उष्णतेचा अंदाज येतो. या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असली तरी या व्हिडिओ मागील सत्य काय आहे? याबद्दल कुक्कुट संशोधन व प्रशिक्षण केंद्र नागपूर येथील सहाय्यक प्राध्यापक आणि एचओडी मुकुंद एम. कदम यांनी अधिक माहिती दिली.

तापमानाचा प्रभाव

गेल्या काही आठवड्यांपासून विदर्भ आणि नागपूरच्या हवामानात कमालीचा बदल होत आहे. उच्च तापमान आणि अधूनमधून होणारा अवकाळी पाऊस, असे मिश्र हवामान आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओतील अंडी ही खाण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली अंडी नसावीत. ती पोल्ट्री फार्मसाठीच्या पिलांची बॉयलर असावी. ती कुठेतरी साठवून ठेवलेली असतील. वातावरणातील आर्द्रता आणि उष्णता असे वातावरण अंडी उबवण्यासाठी पूरक बनल्याने या अंड्यांतून पिलं बाहेर आली असावीत, असे डॉ. कदम यांनी सांगितलं.

ट्रेन अपघातात पूर्ण कुटुंब संपलं; भरपाईत १० लाख मिळाले; ओक्साबोक्शी रडत बिनोद काय म्हणाला?

अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यास २१ दिवस लागतात

पिल्ले बाहेर येण्यासाठी साधारणपणे १८ ते २१ दिवस लागतात. व्हिडिओमधील अंडी सुमारे २१ दिवसांची असावीत. पोषक वातावरण मिळाल्याने ही पिल्ले अंड्यातून बाहेर पडत आहेत. अंड्यातून पिल्ले योग्य वेळी आणि नियमित अंतराने बाहेर पडतात. उष्णतेचा थेट परिणाम या अंड्यांवर होत नाही, असे डॉ. कदम म्हणाले.

नगरमधील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो; फडणवीस संतापले, औरंग्याचं नाव घेणाऱ्यांना…

आरोग्यास धोका नाही

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे काही गैरसमज निर्माण होत आहेत. तथापि, अंडी प्रेमींनी घाबरू नये. कारण आपण जी अंडी खातो ती पांढरी अंडी नसतात. आपण जी अंडी खातो त्याला नापीक अंडी म्हणतात. ती निर्जीव असून अंडी दिसायला पांढरी असतात.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी अंडी फॅटी अंडी आहेत. बॉयलर पिल्ले जन्माला येतात ज्यापासून जीवन घडते. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. ही अंडी उबवण्यास प्रामुख्याने योग्य वेळ आणि पोषक वातावरण आवश्यक आहे, असे कदम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here