चेन्नई: ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वे अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला. हजारपेक्षा अधिक जण या अपघातात जखमी झाले. यानंतर आता तमिळनाडूमध्ये एक मोठा अपघात टळला आहे. रेल्वेच्या एका डब्याला भेग पडली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. त्यानंतर हा डबा वेगळा करण्यात आला. त्या डब्याच्या जागी दुसरा डबा जोडण्यात आला. त्यानंतर ट्रेन रवाना करण्यात आली.कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेस कोल्लमहून चेन्नईला जात होती. रविवारी संध्याकाळी ट्रेन सेंगोट्टाई रेल्वे स्थानकात पोहोचली. त्यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांचं लक्ष एका डब्याच्या खालील भागाकडे गेलं. त्या भागाला भेग पडली होती. कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेसच्या एस-३ डब्याच्या खालील भागाला भेद पडली होती. ही भेग चाकाजवळ होती.
पप्पा, मला विंडो सीट पाहिजे! लेक हट्टाला पेटली अन् जीव वाचला; बापलेकीसोबत चमत्कार घडला
ट्रेनच्या डब्याच्या खालील भागात असलेली भेग रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहिली आणि एकच खळबळ माजली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वेगानं चक्रं फिरली. अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना याबद्दल कळवलं. त्यानंतर ट्रेन तिथेच थांबवण्यात आली.

कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेसला सेंगोट्टोई रेल्वे स्थानकावरच थांबवण्यात आलं. भेग पडलेल्या डब्यातील प्रवाशांची समजूत काढून त्यांना पुढेमागे असलेल्या डब्यांमध्ये शिफ्ट करण्यात आलं. जवळपास एक तासाचा अवधी यात गेला. त्यानंतर कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेस पुढे रवाना करण्यात आली. याची माहिती मदुराई रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांना देण्यात आली.
अरेरे! १२ तासांपासून वडील मृतदेहांमधून वाट काढताहेत, लेकाला शोधताहेत; हृदयद्रावक कहाणी
कोल्लम-चेन्नई एगमोर एक्स्प्रेस मदुराईला पोहोचल्यावर एस-३ डबा वेगळा करण्यात आला. त्याच्या जागी नवा डबा जोडून त्यामध्ये प्रवाशांना बसवण्यात आलं. डब्याला पडलेली भेग बरीच मोठी होती आणि ती चाकाच्या अगदी वर होती. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकली असती. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सजगपणामुळे एस-३ डबा तातडीनं रिकामा करण्यात आला. पुढच्याच स्थानकात त्या डब्याच्या जागी नवा जोडण्यात आला. त्यामुळे मोठा अपघात टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here