सर्व प्रकारच्या मदतीची घोषणा
शोक व्यक्त करताना, रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा, नीता अंबानी म्हणाल्या, ‘रेल्वे दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या पाठीशी मी उभी असून मी जड अंत:करणाने सहवेदना व्यक्त करते. या दुर्घटनेमुळे होणारे दु:ख मी दूर करू शकत नाही, परंतु शोकग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत. या कठीण काळात आम्ही पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.’
जीवनावश्यक वस्तू उरलब्ध करणार
दुर्घटना घडल्यानंतर बालासोरमध्ये उपस्थित रिलायन्स फाऊंडेशन टीम बालासोर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन पथक आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या समन्वयाने काम करत आहे. रिलायन्स फाऊंडेशन जखमींना रुग्णवाहिकेत हलविण्यात मदत करत आहे, मास्क, हातमोजे, ओआरएस, बेडशीट, दिवे आणि गॅस कटर इत्यादीसारख्या इतर आवश्यक बचाव वस्तू तात्काळ पुरवत आहे.
मदतीचे पॅकेज केले जाहीर
> जिओ-बीपी नेटवर्कवरून रुग्णवाहिकांसाठी मोफत इंधन
> रिलायन्स स्टोअर्सद्वारे बाधित कुटुंबांना पुढील सहा महिन्यांसाठी पीठ, साखर, डाळी, तांदूळ, मीठ आणि स्वयंपाकाच्या तेलासह मोफत रेशन पुरवठ्याची तरतूद
> जखमींना त्वरित बरे होण्यासाठी मोफत औषधे
> अपघातामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांवर वैद्यकीय उपचार
> भावनिक आणि मानसोपचारविषयक समुपदेशन सेवा.
> गरज भासल्यास जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे
> अपंग लोकांसाठी व्हीलचेअर, कृत्रिम अवयवांसह सहाय्यांची तरतूद
> नवीन रोजगार संधी शोधण्यासाठी बाधित लोकांना विशेष कौशल्य प्रशिक्षण
> ज्या महिलांनी आपल्या कुटुंबाचा एकमेव कमावणारा माणूस गमावला आहे त्यांच्यासाठी मायक्रोफायनान्स आणि प्रशिक्षणाच्या संधी
> दुर्घटनेत बाधित झालेल्या ग्रामीण कुटुंबांना पर्यायी उपजीविकेसाठी गाय, म्हैस, शेळी, पक्षी यांसारखे पशुधन उपलब्ध करून देणे.
> शोकग्रस्त कुटुंबातील सदस्यांना त्यांची उपजीविका पुन्हा उभारता यावी यासाठी त्यांना एक वर्षासाठी मोफत मोबाईल कनेक्टिव्हिटी.