म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : युतीतील जागावाटपावर होत असलेली विधाने, राज्य मंत्रीमंडळाचा रखडलेला विस्तार, लोकसभा निवडणुकांची गणिते अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शिंदे, फडणवीस यांनी तातडीने दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात या भेटीचे अनेक तर्क लावले जात आहेत. मात्र, या भेटीत निवडणुकीची तयारी, युतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामावून घेणे आणि बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार यावर चर्चा झाल्याचे समजते.

शिंदे-फडणवीस हे रविवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. पुण्यात विविध विकासकामांचे लोकार्पण केल्यानंतर दोघांनी रात्री दिल्ली गाठली. शहा यांना भेटण्यापूर्वी दिल्लीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिंदे यांनी राज्यातील विकासाच्या प्रश्नावर ही भेट होत असल्याचे सांगितले. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार शहा यांनी बैठकीत लोकसभा निवडणुकीची तयारी, महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युतीत सामावून घेणे आणि मंत्रीमंडळ, शासकीय महामंडळावरील रखडलेल्या नियुक्त्या याबाबत चर्चा केल्याचे कळते.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला? डेंजर झोनमधील मंत्र्यांना डच्चू? नव्या चेहऱ्यांना संधी
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला जेमतेम नऊ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. कर्नाटकमधील पराभवामुळे भाजपने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचे महाराष्ट्रावर अधिक लक्ष आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहिल्यास भाजपने कोणती रणनीती आखावी, यावर तिघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युतीत सामावून घेतल्यास कितपत फायदा होऊ शकतो, यावरही बैठकीत मते अजमावण्यात आल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी रस्सीखेच, भाजप मंत्र्यानं दबाव वाढवला, सेनेच्या मंत्र्याचं एक पाऊल मागे
‘राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना-भाजप महायुती एकत्रितच लढविणार आहे. राज्यात आरपीआयही आमच्यासोबतच असणार आहे. आम्ही सोबत लढणार आणि बहुमताने जिंकणार आहोत’, अशी माहिती शिंदे यांनी भेटीनंतर दिली. मंत्रीमंडळ विस्तार, निवडणुका आदींबाबत शहा यांच्यासोबतच्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांबाबतही त्यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘शिवसेना-भाजपा युतीचे सरकार गेले ११ महिने अतिशय एकजुटीने काम करत आहे. आम्ही अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. आमची युती वैचारिक आहे’, असेही त्यांनी नमूद केले.

ठाकरेंना धक्का, मुंबईच्या आजी-माजी नगरसेवकांच्या हाती शिंदेचा भगवा

‘औरंग्याचे नाव घेणाऱ्याला माफी नाही’

अहमदनगर येथील एका मिरवणुकीत काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो झळकवले आहेत. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. ‘औरंगजेबाचे फोटो झळकावणे अजिबात मान्य नाही. महाराष्ट्राचे आराध्यदैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच आहेत. या महाराष्ट्रात कोणी औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला माफी नाही’, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here