नवी दिल्ली: मुंबईचा धाकड फलंदाज अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार खेळ दाखवून तब्बल दीड वर्षानंतर भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केले आहे. उद्या म्हणजेच ७ जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अजिंक्यासोबत संपूर्ण संघ कसून सराव करत आहे. पण अजिंक्यवर सर्वांच्या विशेष नजरा असणार आहेत. पण अजिंक्य रहाणे केवळ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीच संघात आहे का? या प्रश्नावर आता खुद्द संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भाष्य केले आहे.रहाणे एकेकाळी टीम इंडियाचा उपकर्णधार होता पण नंतर खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळण्यात आले. पण आता तो पुन्हा संघात परतला आहे. मुंबईच्या श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे रहाणेला संघात स्थान मिळाले. रहाणेच्या जागी अय्यरने कसोटी संघात स्थान मिळवले होते. आयपीएलपूर्वी अय्यरला दुखापत झाली होती आणि त्यामुळे कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तो खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी रहाणे संघात आला आहे. अशा स्थितीत अय्यर आल्यानंतर रहाणे बाहेर जाणार का, असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. पण रहाणेसाठी ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघात कायम राहण्यासाठी एकमेव संधी नसल्याचे द्रविड यांनी म्हटले आहे.

स्वतःच्या लग्नात अशी चूक कोण करतं? अजिंक्यने लग्नमंडपात जे केलं ते पाहून पत्नी राधिका सुद्धा…
काय म्हणाले द्रविड

द्रविड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत रहाणेबद्दल सांगितले की, जर त्याने परतल्यावर चांगली कामगिरी केली तर तो बराच काळ संघात खेळू शकतो. द्रविड म्हणाले असं कुठे लिखित नाही की तुला एकच संधी मिळेल. प्रशिक्षकाने स्पष्टपणे सांगितले की, जर रहाणेने चांगली कामगिरी करून दाखवली आणि त्याच्यात किती प्रतिभा आहे, ते त्याने दाखवून दिले तर कोणास ठाऊक पुढे काय होईल. तर सोबतच रहाणेच्या संघात पुनरागमनाबद्दल द्रविडने यांनीही आनंद व्यक्त केला आणि त्याला संघात पुन्हा घेणे चांगले असल्याचे सांगितले.

द्रविड म्हणाले की, रहाणेकडे खूप अनुभव आहे आणि त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. प्रशिक्षक म्हणाले की, रहाणेने इंग्लंडमध्येही काही उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत आणि स्लीपमध्ये त्याचे झेल उत्कृष्ट आहेत. सोबतच रहाणेने संघाचे नेतृत्व केले आहे आणि यशही मिळवून दिले आहे आणि त्यामुळे त्याला संघात सहभागी केले आहे ही चांगली गोष्ट आहे.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

रहाणेच्या नेतृत्त्वाखाली विजय

एकेकाळी रहाणे हा टीम इंडियाच्या फलंदाजीचा मुख्य दुवा असायचा. त्याने आपल्या बॅटने भारताला अनेकदा वाचवले आहे आणि जिंकवले आहे. विराट कोहली संघाचा कर्णधार असताना रहाणे उपकर्णधार होता. २०२०-२१ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता तेव्हा कोहली आपल्या मुलीच्या जन्मासाठी मायदेशी परतला आणि त्यानंतर रहाणेने संघाचे नेतृत्व केले.या मालिकेत भारताने पहिला सामना गमावल्यानंतर पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात सलग दुसऱ्यांदा पराभूत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here