सोलापूर: पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते, दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे बीआरएसच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजीत पाटलांना पक्षात घेतल्याने भगीरथ भालके नाराज आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे भगीरथ भालके यांनी दुसऱ्या राजकीय पक्षांची चाचपणी करण्यास सुरु केली आहे.

वाऱ्याची दिशा बदलली, वचपा काढण्यासाठी भालकेंना ऑफर, पवारांच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं!


महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंढरपूरचे तत्कालीन आमदार भारत नाना भालकेंच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालकेंच्या मुलाला म्हणजेच भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली होती. मात्र, भगीरथ भालकेंना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपचे उमेदवार असलेल्या समाधान आवताडेंनी भालकेंना पराभूत करत विधानसभा गाठली. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्षांची ताकत एकत्र असूनही भाजपने भालकेंना पराभूत केलं होतं.
वाऱ्याची दिशा बदलली, वचपा काढण्यासाठी भालकेंना ऑफर, पवारांच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं!
पराभवानंतर भगीरथ भालके पक्षात फारसे सक्रिय नव्हते. तसेच शरद पवारांनी साखर सम्राट अशी ओळख असलेल्या अभिजीत पाटलांना पक्षात घेतल्याने त्यांनाच पुढील निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे. खुद्द पवारांनी देखील पाटलांना तयारीला लागण्याचे आदेश दिल्याने भालके नाराज होते.

भगीरथ भालकेचा राष्ट्रवादीला मोठा हादरा बसण्याची शक्यता:

राष्ट्रवादी काँग्रेस नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैद्राबादकडे रवाना होणार आहेत. केसीआर यांनी भालके यांच्यासाठी सोलापूरमध्ये खास विमान पाठवण्याचे नियोजन केले होते.भगीरथ भालकेनी अजूनही तेलंगणाकडे जाण्याचा निश्चित कार्यक्रम ठरवला नाही. भगीरथ भालके हे जर बीआरएस पक्षात गेले तर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
अभिजीत पाटलांच्या तिकीटाने भालके नाराज, सकाळी पवारांची भेट, दुपारी थेट पटोलेंशी बंद दाराआड चर्चा
मी बीआरएस पक्षात प्रवेश केला नाही. केवळ चर्चा करण्यासाठी मी तेलंगणा येथे जाणार आहे. बीआरएस पक्षाकडून निमंत्रण आलं आहे. परंतु, पंढरपूर येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. त्याच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी असल्याने तेलंगणाला जाण्याचा निर्णय तात्पुरता रद्द केला असून लवकरच बीआरएसच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी भेटणार असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली आहे.

वसंतराव काळे सहकारी कारखान्याच निवडणूक लागल्याने पक्ष प्रवेश लांबणीवर:

भगीरथ भालकेनी माहिती देताना सांगितले की,बीआरएस पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहेत. पंढरपूर येथील शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. बीआरएस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच सोमवारी ६ जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी आर यांच्या भेटीला जाणार असल्याबाबत अजून काही हालचाली नाहीत. पंढरपूर येथील सहकारी शिरोमणी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. त्याचा प्रचार शुभारंभ मंगळवारी ७ जून रोजी आहे. त्यामुळे अजूनतरी तेलंगणाकडे जाण्याचा निश्चित निर्णय झाला नाही, असे भालकेंनी स्पष्ट केले आहे.

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का: १८ वर्षांनंतर कारखान्यात सत्तांतर; भगीरथ भालकेंच्या पॅनलचा धुव्वा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here