Mumbai Special Court Hearing On Shiv sena Workers Agitation : मुंबईतील विशेष कोर्टात २००५ च्या एका प्रकरणात सुनवणी झाली. या खटल्यासाठी शिवसेनेतून फुटलेल्या नेत्यांवर कोर्टात हजर राहण्याची वेळ आली. या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीने सर्वांना हसू आलं.

दादर पोलिसांनी तपासाअंती दाखल केलेल्या आरोपपत्राप्रमाणे मुख्य सरकारी वकील जयसिंग देसाई यांनी आरोपनिश्चितीचे प्रारूप सादर केल्यानंतर या ३८ आरोपींवरील आरोपनिश्चिती प्रलंबित होती. अनेक आरोपी नेते वारंवार गैरहजर राहत असल्याने न्यायाधीशांनी सर्वांना अखेरची संधी दिली होती. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीला बहुतांश सगळे हजर राहिले. त्यानंतर दंगल करणे, बेकायदा जमाव जमवणे, जमावबंदीचा आदेश मोडणे, सरकारी सेवकांना कर्तव्यापासून रोखणे, अशा विविध आरोपांबाबत भादंविच्या कलम १४३, १४४, १४५, १४६, १४७, ३५३, ३३२ अन्वये तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा व महाराष्ट्र पोलिस कायद्याप्रमाणे आरोप निश्चित केले असल्याचे न्यायाधीशांनी त्यांच्यासमोर जाहीर केले. तसेच हे आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा सर्वांना केली. त्या वेळी आरोप मान्य नाहीत, असे सर्वांनीच एकमुखाने सांगितले. ते पाहून न्यायाधीशांनी वरील मिश्किल टिप्पणी केली. तेव्हा, नेतेमंडळी व त्यांचे वकील, बंदोबस्तासाठी असलेले पोलिस, न्यायालयातील कर्मचारी वर्ग अशा सर्वांमध्ये एकच हशा पिकला आणि संपूर्ण धीरगंभीर वातावरण काही काळ बदलून गेले.
परब, सरवणकर, नांदगावकर यांच्याबरोबरच ज्येष्ठ शिवसैनिक दगडू सकपाळ, श्रद्धा जाधव, किरण पावसकर असे अनेक आरोपी न्यायालयात हजर होते. त्या सर्वांनीच आरोप अमान्य केल्याने आता त्यांच्याविरोधात खटल्याची सुनावणी सुरू होईल. मंगळवारच्या आरोपनिश्चिती प्रक्रियेला संजय बावके, रवींद्र चव्हाण व हरिश्चंद्र सोलकर हे आरोपी गैरहजर राहिल्याने न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. तर, श्रीधर सावंत हे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना हजेरी लावण्यासाठी मुदत देण्यात आली. या खटल्याची पुढील सुनावणी आता २१ जून रोजी होईल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.