भुवनेश्वर: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघाताला पाच दिवस उलटून गेल्यानंतही या दुर्घटनेतील अनेक भयावह कहाण्या समोर येत आहेत. या भीषण रेल्वे अपघातामध्ये २७८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर हजारापेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले होते. तीन ट्रेनची धडक झाल्यामुळे घटनास्थळी रेल्वेचे डबे उलटेपालटे होऊन पडले होते. कोरोमंडल एक्प्रेस आणि हावडा एक्स्प्रेसमधील प्रवासी या ट्रेनच्या डब्ब्यांमध्ये अडकून पडले होते. या सगळ्या जखमी प्रवाशांना आणि प्रत्येक मृतदेह बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) नऊ पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Odisha Accident: त्या मार्गावर पहिली ट्रेन धावली, अपघाताचं दृश्य पाहून प्रवासी ‘जगन्नाथ, जगन्नाथ’ पुटपुटत राहिले

एनडीआरएफच्या जवानांनी अहोरात्र कष्ट करून बचावकार्य राबवले होते. या जवानांनी उन्हातान्हात उभं राहून, रात्रीची झोप न घेता तब्बल ७२ तास अथक काम केले. ढिगाऱ्यांखालून आणि चेंदामेंदा झालेल्या रेल्वेच्या डब्ब्यांमधून जिवंत प्रवाशांना बाहेर काढणे आणि छिन्नविछिन्न झालेले मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याचे काम सतत सुरु होते. सतत या सगळ्या वातावरणात राहिल्यामुळे एनडीआरएफच्या पथकातील जवानांना मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.

Odisha Accident: हात-पाय धडावेगळे, छिन्नविछिन्न चेहरे, वायरच्या शॉकने जळालेली कलेवरं, १०१ मृतदेहांची ओळख पटेना

एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बचाव पथकातील जवानांविषयी माहिती दिली. ओडिशा येथील रेस्क्यू ऑपरेशन संपल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांना भ्रम होत आहेत. या जवानांना बचावकार्य राबवताना सतत जखमी लोक आणि विद्रुप झालेले मृतदेह हाताळावे लागत होते. या जवानांनी अपघातस्थळावरुन १२१ मृतदेह बाहेर काढले होते. यापैकी अनेक मृतदेहांचे हातपाय धडावेगळे झाले होते, काहींचे चेहरे विद्रूप झाले होते. तर ओव्हरहेड वायरचा शॉक लागलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाला होता. हे एकूणच दृश्य अत्यंत भयावह होते. त्यामुळे आता बचावकार्य संपल्यानंतर एनडीआरएफच्या काही जवानांना भास होऊ लागले आहेत. एका जवानाला आता पाणी पाहिले की रक्त बघितल्याचा भास होत आहे. तर आणखी एका एनडीआरएफच्या जवानाची अन्नावरची वासना पूर्णपणे उडाली आहे. मानसिक धक्का बसल्यामुळे या जवानांना अशाप्रकारचे भ्रम आणि त्रास जाणवत आहेत. डॉक्टरांकडून तातडीने या जवानांचे मानसिक समूपदेशन सुरु करण्यात आल्याची माहिती एनडीआरएफच्या महासंचालकांनी दिली.

कोरोमंडल एक्सप्रेसच्या भीषण अपघातानंतर ५१ तासांनी स्थिती पूर्ववत, पहिली ट्रेन रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here