नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा इंडियन टीमचा निर्णय
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय चाहत्यांना १० वर्षांनंतर ICC ट्रॉफी जिंकण्याची आशा आहे. टीम इंडियाने २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
लंडनमध्ये मोठा अपघात टळला
दरम्यान, रोहित शर्माशी संबंधित एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ओव्हल मैदानावर येण्यासाठी पायऱ्या उतरत आहे. या दरम्यान, त्याचा पाय घसरता घसरता वाचतो. रोहितचा तोल जरा गेला असता तर तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. एवढेच नाही तर टीम इंडियाला अचानक कर्णधारही बदलावा लागला असता. मात्र, सुदैवाने रोहितला काहीही झाले नाही.
२८९ धावांत ३ विकेट
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत ३ विकेट गमावून २८९ धावा केल्या आहेत. ट्रेविस हेडने शतक झळकावलं असून सध्या तो १२४ धावांवर खेळत आहे. तर स्टीव्ह स्मिथ हा सध्या ७९ धावांसह खेळतो आहे.
I抎 must examine with you here. Which is not something I often do! I get pleasure from reading a put up that can make folks think. Also, thanks for allowing me to comment!
This actually answered my drawback, thanks!