रत्नागिरी: बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. कोकणातील गणपतीपुळे या पर्यटनस्थळ असलेल्या समुद्रकिनारी याचा मोठा फटका बसला आहे. समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने भरतीचे पाणी थेट किनाऱ्यावर असलेल्या दुकानांमध्ये घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. समुद्राच्या मोठ्या भरतीचा फटका गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याला बसला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. आज शुक्रवारीही हायटाईडचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी- गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने गणपतीपुळे येथील समुद्राचे पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत शिरले यामध्ये काही पर्यटकांचे सामान वाहून गेले. दुकानांमधून काही वस्तूही वाहून गेल्या आहेत. समुद्राचे पाणी गणपतीपुळे येथील श्री गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी आले होते. बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.

Cyclone Biporjoy : राज्यावर ३ दिवस अस्मानी संकट, चक्रीवादळामुळे मुंबईसह या भागांना धोक्याचा इशारा

गणपतीपुळे किनारा हा पर्यटनसाठी हॉटस्पॉट मानला जातो. पर्यटकांची या किनाऱ्यावर नेहमीच मोठी गर्दी असते. हवामान विभागाकडून या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही किनाऱ्यावरती पाहायला मिळेल असा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचाही समावेश आहे. मात्र हा धोका लक्षात घेऊन गणपतीपुळे चौपाटीवर असलेल्या दुकानदारांनी आपली दुकाने उचलली आहेत. तसेच समुद्रकिनाऱ्यावरती लाईफ गार्ड उपस्थित आहेत. पर्यटकांनीही समुद्रात जाऊ नये असाही सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात हायअलर्ट

बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या ४८ तासांमध्ये आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार पुढील तीन दिवस समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळामुळे धोकादायक परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही हायअलर्ट देण्यात आला आहे. बई, पालघर, कोकण किनारपट्टी भागामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार असून गुजरातलाही या चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये यावेळी मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

अहमदनगरमध्ये वादळी पावसाचा हाहाकार; केळीच्या बागा आडव्या, तर काही ठिकाणी घरावरचं छप्परच उडालं

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here