शिर्डी: शिर्डी मतदारसंघातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १७ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत विखे पाटलांच्या विरोधात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने युती करत विखेंसमोर आव्हान उभे केले आहे. थोरात-कोल्हे यांच्या युतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विखे पाटलांची डोकेदुखी वाढणार आहे.
काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे आमदार राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील पक्षांतर्गत वाद समोर आला होता. तो वाद देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात असतानाच गणेश कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने विखेंविरोधात भूमिका घेत थोरातांसोबत युती केल्याने भाजपचा पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. काँग्रेसनेते बाळासाहेब थोरातांना मिळालेल्या भाजपच्या कोल्हे गटाच्या साथीने एकतर्फी वाटणाऱ्या गणेश कारखान्याच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. आधी राम शिंदे आणि आता कोल्हे यांनी घेतलेल्या भूमिकेने विखे पाटलांचे अहमदनगर जिल्ह्यातील वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपमधीलच एक गट सक्रिय झालाय का? विखे पाटलांकडून पक्षातील नेत्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही का? असे अनेक प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे आमदार राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील पक्षांतर्गत वाद समोर आला होता. तो वाद देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात असतानाच गणेश कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने विखेंविरोधात भूमिका घेत थोरातांसोबत युती केल्याने भाजपचा पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. काँग्रेसनेते बाळासाहेब थोरातांना मिळालेल्या भाजपच्या कोल्हे गटाच्या साथीने एकतर्फी वाटणाऱ्या गणेश कारखान्याच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. आधी राम शिंदे आणि आता कोल्हे यांनी घेतलेल्या भूमिकेने विखे पाटलांचे अहमदनगर जिल्ह्यातील वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपमधीलच एक गट सक्रिय झालाय का? विखे पाटलांकडून पक्षातील नेत्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही का? असे अनेक प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
ही अभद्र युती: विखे पाटील
थोरात आणि कोल्हे यांची ही अभद्र युती असून मी उत्तर देण्यापेक्षा कारखान्याचे सभासदच त्यांना निवडणुकीत उत्तर देतील अशी, टीका यानिमित्ताने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये.
बिघडवण्याचे नाही घडवण्याचे काम करणार: थोरात
विखे पाटलांच्या या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी प्रतिउत्तर देत पलटवार केलाय. गणेशनगर कारखाना शंकरराव कोल्हेंकडे असताना त्यांनी तो चांगला चालवला. मधल्या काळात मोठ्या माणसांनी तो चालवायला घेतला मात्र चालला नाही. त्यामुळे गणेश परिसरातील अर्थव्यवस्था आणि शेतकरी अडचणीत आले असून मी आणि कोल्हे शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो आहोत. आमचा हेतू चांगला असून आम्ही बिघडवण्याचे नाही तर घडवण्याचे काम करणार आहे. मात्र आमच्या युतीला कुणी अभद्र म्हणत असेल तर काय बोलावे, असे थोरात म्हणालेत.