सर्वाधिक ब्लॅकस्पॉट नगर जिल्ह्यात
या यादीनुसार राष्ट्रीय महामार्गावर एकूण ६१० ठिकाणे ‘ब्लॅकस्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे ४५ नगर येथे आढळून आली आहेत. याशिवाय संभाजीनगरमध्ये २१, नागपूर शहर १३, नाशिक शहर १७, नवी मुंबई १५, पुणे शहर १३, सोलापूर २१, ठाणे शहर १५, पिंपरी-चिंचवड १७, अमरावती ग्रामीण १६, औरंगाबाद ग्रामीण १५, बीड १२, चंद्रपूर ११, धुळे ३४, जालना १३, कोल्हापूर १५, नागपूर ग्रामीण ३७, नांदेड ४०, नंदुरबार ३०, नाशिक ग्रामीण ३७, पुणे ग्रामीण ९, पालघर ११, रायगड २१, रत्नागिरी ६, सांगली १५, सातारा ३५, सोलापूर ग्रामीण ३७, ठाणे ग्रामीण ९, वर्धा १५, आदींचा समावेश आहे. तर, राज्य महामार्गावर २०२ ठिकाणी ‘ब्लॅकस्पॉट’ आढळून आले आहेत.
मुंबईत ४८ ठिकाणे धोकादायक
मुंबईत जवळपास ४८ ठिकाणे ‘ब्लॅकस्पॉट’ म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. त्यात मरिन ड्राइव्ह येथील मेघदूत ब्रिज, वरळी येथील सिटी बेकरी, दादर येथील फुल मार्केट, माहीम येथील माहीम फाटक, धारावी येथील सायन-वांग्रे लिंक रोड, चेंबूर येथील चेंबूर नाका, पंतनगर येथील रमाबाईनगर बस थांबा, हाजीअली जंक्शन, मानखुर्द येथील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे.
१२० ‘ब्लॅकस्पॉट’ची कामे पूर्ण
परिवहन विभागाने सार्वजनिक विभागाला दिलेल्या आकडेवारीनुसार. राष्ट्रीय महामार्गावरील ६१०पैकी १२० ‘ब्लॅकस्पॉट’ची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर ८४ ‘ब्लॅकस्पॉट’ची कामे सुरू असून लवकरच ती पूर्ण करण्यात येणार आहेत. ही कामे करण्यासाठी तीन संस्थांकडे जबाबदारी देण्यात येते. यात एचएआय, एमएसआरडीसी, एनएच (पीडब्लूडी) यांचा समावेश आहे.
राज्यातील ‘ब्लॅकस्पॉट’
– राष्ट्रीय महामार्ग : ६१०
– राज्य महामार्ग : २०२
– एकूण : १००४