पोलिस करोनाविरुद्धच्या लढ्यात आजही अहोरात्र काम करत आहेत. लॉकडाउनमध्ये पोलिसांनी अनेक नागरिकांना मदतीचा हातही पुढे केला होता. पोलिस दलातही करोनानं शिरकाव केला आणि करोनाशी लढा देत असताना आत्तापर्यंत राज्यातील करोनाबाधितांची संख्या १२ हजार ८७७ इतकी झाली आहे. त्यामधील १० हजार ४९१ जणांनी करोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. तर, राज्यातील विविध रुग्णालयांत २ हजार २५५ अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर, आत्तापर्यंत राज्यात १३१ पोलिसांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यातील करोनाग्रस्त पोलिसांमध्ये १ हजार ३५८ अधिकारी व ११ हजार ५१९ कर्मचारी यांचा समावेश आहे. तर, उपचार सुरू असलेल्या २ हजार २५५ पोलिसांमध्ये ३०५ अधिकारी व १ हजार ९५० कर्माचारी आहेत. करोनावर मात केलेल्या पोलिसांमध्ये १ हजार ४१ व ९ हजार ४५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, करोनामुळं दगावलेल्या १३१ पोलिसांमध्ये १२ अधिकारी व ११९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
वाचाः
परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पाठवण्याच्या कामातही पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. करोनाला हरवायचे असल्याने प्रत्येक नागरिकाने नियमांचे पालन करावे, यासाठी रस्त्यावर उतरत पोलिस नागरिकांना नियम आणि सूचनांबाबत सांगत होते. लॉकडाउनमध्ये शिथिलता आली असली तरी पोलिसांचे काम थांबलेले नाही. प्रवासाचा ई-पास देणे तसेच इतरही अनेक कामांची जबाबदारी पोलिस अत्यंत चोखपणे पार पाडत आहेत. त्यातूनच पोलीस दल करोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राज्याच्या सर्व विभागांत पोलीस दलात करोनाने शिरकाव केला आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
Thanks so much for the blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.