म. टा. प्रतिनिधी, पुणे : अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी हवामान अनुकूल असल्याने पुढील ४८ तासांत मान्सून गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागांत दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. ईशान्येकडील बहुतेक राज्ये व्यापून मान्सूनने शनिवारी कर्नाटकमधील कारवारपर्यंत मजल मारली.
यंदा सर्वसाधारण तारखेपेक्षा मान्सून आठवडाभर उशिराने केरळमध्ये झाला. तेव्हापासून हवामान अनुकूल राहिल्याने मान्सूनची प्रगती वेगाने सुरू आहे. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ सक्रिय असल्याने फक्त पश्चिम किनारपट्टीवरून मान्सूनची प्रगती सुरू असून, दुसरीकडे बांगलादेश जवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पूर्वेकडून मान्सूनची प्रगती तुलनेने जास्त आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मान्सूनने केरळचा उर्वरित भाग, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग; तसेच ईशान्येकडील बहुतांश राज्ये व्यापली. हवामान अनुकूल असल्याने मान्सूनची पुढील ४८ तासांत आणखी प्रगती अपेक्षित असून, सोमवारपर्यंत कर्नाटकचा आणखी काही भाग, गोवा, महाराष्ट्राचा काही भाग; तसेच ईशान्येकडील उर्वरित राज्ये आणि पश्चिम बंगालचा काही भाग मान्सून व्यापू शकतो.
राज्याच्या काही भागांत मान्सूनचे आगमन अपेक्षित असले तरी पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी आणखी दहा दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते, असे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. एम. राजीवन म्हणाले, ‘मान्सूनची सध्या वेगाने प्रगती होत असली तरी, २० जूनच्या आधी मॉन्सून ट्रफ आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची चिन्हे नाहीत. २० जूननंतर सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.’
यंदा सर्वसाधारण तारखेपेक्षा मान्सून आठवडाभर उशिराने केरळमध्ये झाला. तेव्हापासून हवामान अनुकूल राहिल्याने मान्सूनची प्रगती वेगाने सुरू आहे. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ सक्रिय असल्याने फक्त पश्चिम किनारपट्टीवरून मान्सूनची प्रगती सुरू असून, दुसरीकडे बांगलादेश जवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पूर्वेकडून मान्सूनची प्रगती तुलनेने जास्त आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मान्सूनने केरळचा उर्वरित भाग, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग; तसेच ईशान्येकडील बहुतांश राज्ये व्यापली. हवामान अनुकूल असल्याने मान्सूनची पुढील ४८ तासांत आणखी प्रगती अपेक्षित असून, सोमवारपर्यंत कर्नाटकचा आणखी काही भाग, गोवा, महाराष्ट्राचा काही भाग; तसेच ईशान्येकडील उर्वरित राज्ये आणि पश्चिम बंगालचा काही भाग मान्सून व्यापू शकतो.
राज्याच्या काही भागांत मान्सूनचे आगमन अपेक्षित असले तरी पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी आणखी दहा दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते, असे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. एम. राजीवन म्हणाले, ‘मान्सूनची सध्या वेगाने प्रगती होत असली तरी, २० जूनच्या आधी मॉन्सून ट्रफ आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची चिन्हे नाहीत. २० जूननंतर सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.’
बिपरजॉय पाकिस्तानकडे सरकणार?
अरबी समुद्रात सक्रिय असलेले बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून ६०० किमी पश्चिमेकडून संथ गतीने (ताशी तीन किमी) प्रवास करीत असून, रविवारपर्यंत ते अत्यंत तीव्र चक्रीवादळाची श्रेणी गाठेल. पुढील २४ तासांत बिपरजॉय ईशान्येकडे प्रवास करण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील तीन दिवस वादळ वायव्येकडे प्रवास करील. मॉडेलनुसार वादळाचा मार्ग प्रथमिकदृष्ट्या पाकिस्तानकडे जाताना दिसत असून, गुजरात किनारपट्टीवर ११ ते १५ जून दरम्यान समुद्र खवळलेला असेल, असे आयएमडीने अंदाजात म्हटले आहे.