गेल्या तीन महिन्यांपासून सुशांतसिंह प्रकरणावरून देशभरात राजकीय गदारोळ सुरू आहे. या प्रकरणाशी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. तसंच, मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यामुळं राज्य सरकार कोणालातरी वाचवण्यासाठी सीबीआयकडे हे प्रकरण सोपावण्यास तयार होत नसल्याचा टीका सातत्यानं विरोधकांकडून होत होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश दिल्यानंतर भाजपनं ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘राजीनामा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मागितला पाहिजे. आंधळा आणि बहिरा पण सांगेल की मुंबई पोलिसांवर मागच्या ६५ दिवसांत कोण दबाव टाकत होतं. एवढा दबाव फक्त मुख्यमंत्री कार्यालय टाकू शकतं म्हणून राजीनामा पण मुख्यमंत्र्यांनीच दिला पाहिजे,’ असं ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केलं आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सुशांत प्रकरणात तब्बल दोन महिने साधा एफआयआर नोंदवून न घेणं हे दुर्दैवी आहे. ह्याची जबाबदारी घेऊन महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. सुशांतच्या कुटुंबालाचा गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. ठाकरे सरकारची दादागिरी आता संपेल. हे सरकार आतातरी धडा घेईल,’ असं सांगतानाच, ‘सुशांतसिंहच्या कुटुंबाला न्याय मिळेल,’ असा विश्वासही सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
Thank you ever so for you article post.
Thanks so much for the blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.