शुभम जनार्धन नखाते (वय ३०, रा. साईबाबा मंदिर, तापकीर चौक, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भाजप नगरसेविकेचा मुलगा राज तापकीर, ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय २३), प्रवीण ज्योतीराम धुमाळ (वय २१), अविनाश धनराज भंडारे (वय २३), अजय भारत वाकोडे (वय २३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मोरेश्वर रमेश आष्टे (वय २१), प्रेम वाघमारे (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडापावच्या पैशांवरून १५ दिवसांपूर्वी शुभम आणि आरोपींमध्ये भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून त्यांच्यात बुधवारी (१९ ऑगस्ट) संध्याकाळी साडेचार वाजता पुन्हा भांडण झाले होते. बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपींनी शुभम याला तापकीर चौकातील धुंडिराज मंगल कार्यालय येथे बोलावले. तेथे आल्यावर बोलण्यापूर्वीच वाद सुरू झाले. त्यानंतर शुभमच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. त्यातच शुभमचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सातपैकी पाच जणांना अटक केली. शुभम याच्यावर विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. तापकीर आणि नखाते हे नातेवाइक असून, त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I really like and appreciate your blog post.
A big thank you for your article.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.