महाराष्ट्रातील गावात भीषण पाणी संकट

महाराष्ट्रातील गावात भीषण पाणी संकट

गावात टेकडीच्या उतारावर एकमेव वाडी विहिर आहे. देब्रामल येथील लोक दररोज आपल्या कुटुंबाला जिवंत ठेवण्यासाठी या विहिरीत दररोज एवरेस्टसारखी चढाई करतात. वाडी विहिरीपर्यंत पोहोचण्याचा रस्ताही सोपा नाही. रात्री उशिरापर्यंत एलईडी दिव्यांच्या उजेडात इथपर्यंत पोहोचण्याचं काम सुरू असतं. त्यानंतर रात्रभर रांगा लावून विहिरीतून पाणी काढलं जातं. या गावात अनेक पिढ्या आल्या, पण पाण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे. या गावात पाणी काढण्यासाठी ११ वर्षाच्या मुलापासून ५० वर्षांच्या व्यक्तीपर्यंत असे जवळपास ५० जण आटलेल्या खोल विहिरीत उतरुन पाणी काढण्याचं काम करतात.

विहिरीच्या तळाशी ४० फूट खोल जाऊन पाणी काढावं लागतं

विहिरीच्या तळाशी ४० फूट खोल जाऊन पाणी काढावं लागतं

रात्री विहिरीच्या तळापर्यंत जाऊन पाणी काढण्यासाठी मोठी चढाओढ असते. विहिरीत चढणं-उतरणं ही अनेकांसाठी आता कला झाली असून अनेक लोक यात पारंगत झाले आहेत. स्त्रिया आणि लहान मुलांसह कुटुंबातील लोक विहिरीतून पाणी काढण्यासाठी रात्रभर रांगेत असतात. येथील एका गावकऱ्याने सांगितलं, की मी माझ्या वडिलांना याच विहिरीत चढता-उतरताना पाहिलं आहे. ही विहीर कित्येक वर्षांपासून आमचं आयुष्य असून आता अशाप्रकारे पाणी काढणं आमच्या सवयीचं झालं आहे. पाय निसटला तर ४० फूट खोल पडण्याचा धोका असतो.

विहिरीत खाली उतरुन पुन्हा वर येणं अतिशय त्रासदायक ठरतं

विहिरीत खाली उतरुन पुन्हा वर येणं अतिशय त्रासदायक ठरतं

पाच फुटांपर्यंत विहिरीत खाली उतरल्यानंतर काळामिट्ट अंधार आहे. केवळ आपल्या इंद्रियांच्या साहाय्याने विहिरीत खाली उतरावं लागतं. LED च्या उजेडात विहिरीच्या तळाशी पाणी जमा करण्यास तासभर जातो. पाण्याची भांडी भरल्यानंतर वर उभे असलेले इतर कुटुंबिय भांडी दोरीने वर खेचण्यास सुरुवात करतात. विहिरीत चढणं-उतरणं अतिशय कठीण होतं. श्वास घेण्यास त्रास होतो. थकवा, अंगदुखी होऊ लागते. या गोष्टी इथेच थांबत नाहीत, आता अजून पुढे या बादल्या, पाण्याची भांडी घेऊन आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आणखी तासभर चालावं लागतं.

लहान मुलांपासून – वृद्धांपर्यंत सर्वच विहिरीत उतरतात

लहान मुलांपासून - वृद्धांपर्यंत सर्वच विहिरीत उतरतात

विहिरीतून पाणी काढण्यासाठी रांग लावावी लागते. अनेक महिला आणि लहान मुलं दुर्गम रस्ता पार करुन विहिरीजवळ रांग लावतात. मार्च महिन्यापासून आम्ही रोज विहिरीजवळ झोपतो. जर विहिरीजवळ झोपलो नाही, तर आमचा विहिरीतून पाणी काढण्यासाठी नंबर येणार नाही आणि त्यामुळे आम्हाला पाणी मिळू शकत नाही, असं येथील गावकरी सांगतात. जवळपास ४० कुटुंब या विहिरीतील पाण्यावर अवलंबून आहेत. १० – १० वर्षांची मुलंही पाणी काढण्यासाठी विहिरीत उतरतात. लहान मुलं खाली तर उतरतात, पण वर चढणं त्यांना कठीण होतं, त्यामुळे त्यांना बादलीत बसवून वर खेचावं लागतं.

पाण्याची टाकी, हातपंप आहेत…पण त्यात पाणी नाही

पाण्याची टाकी, हातपंप आहेत...पण त्यात पाणी नाही

देब्रामल हा महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक परिवर्तन मिशनचा एक भाग होता. येथील एका रहिवाशाने सांगितलं, की २०१७ मध्ये सरकारी अधिकारी इथे सर्वेक्षणासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला आमचं गाव एका योजनेखाली असल्याचं सांगितलं. ते आम्हाला एक टाकी बांधून देतील आणि आमची पाण्याची समस्या दूर होईल, असं सांगण्यात आलं होतं. आता पाण्याची टाकी आहे, पण त्यात पाणी नाही. सध्या पाण्याची टाकी, १७ हातपंप आणि दोन विहिरी आहेत, पण त्यात पाणी नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

नंदुरबारमधील या भयंकर वास्तवाबाबत काय म्हणाल्या कलेक्टर?

नंदुरबारमधील या भयंकर वास्तवाबाबत काय म्हणाल्या कलेक्टर?

नंदुरबारच्या कलेक्टर मनीषा खत्री यांनी सांगितलं, की आम्ही मागील वर्षी या गावात गेलो होतो. आम्ही देब्रामलसाठी जिल्हा परिषद आणि PESA फंड्सद्वारे काही योजना लाँच केल्या होत्या, पण इथे भूमिगत पाणी अतिशय कमी आहे. ही मोठी समस्या आहे. आता जल जीवन मिशनअंतर्गत आम्ही अशा अनेक गावांचा सर्व्हे करत आहोत आणि या समस्यांवर लाँग टर्म उपाय शोधत आहोत. (सर्व फोटो: Aditya Waikul, TOI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here