राज्यातील करोनाची स्थिती चिंता वाढवणारी आहे. आज राज्यात तब्बल १४ हजार ४९२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६ लाख ४३ हजार २८९ इतका झाला आहे. राज्यातील विविध रुग्णालयांत सध्या १ लाख ६२ हजार ४९१ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
एकीकडे राज्यातील रुग्णांचा आलेख वाढत असताना एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आज तब्बल १२ हजार २४३ रुग्णांनी करोनाची लढाई जिंकली आहे. तर, राज्यात आत्तापर्यंत ४ लाख ५९ हजार १२४ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.३७ टक्के इतका झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट वाढत असल्यानं किंचित दिलासा मिळत आहे. राज्यात सध्या ११ लाख ७६ हजार २६१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३६ हजार ६३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यात गेल्या २४ तासांत ३२६ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांची संख्या २१ हजार ३५९ इतकी झाली आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर ३.३२ टक्के इतका झाला आहे. तर, राज्यात आतपर्यंत ३४ लाख १४ हजार ८०९ चाचण्यांपैकी ६ लाख ४३ हजार २८९ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
A big thank you for your article.
A big thank you for your article.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.