म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात यंदाही महापालिकेने पंचतारांकित रेटिंगसाठी अर्ज केला होता. मात्र पालिकेला शून्य स्टार मिळाला आहे. गेल्या वर्षी पालिकेला दोन स्टार मिळाले होते, तेव्हा पालिकेने तीन तारांकित (थ्री स्टार) रेटिंगसाठी अर्ज केले होता. हे स्टार हुकल्याने एकूण स्पर्धेतील एक हजार गुण कमी झाले. त्यामुळे यंदा क्रमाक शुन्यापर्यंत खाली आला आहे.

पंचतारांकित रेटिंगसाठी हगणदारीमुक्त शहर, किती सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृह उपलब्ध आहेत, व्यावसायिक विभाग किती, किती वेळ सार्वजनिक ठिकाणी साफसफाई केली जाते. घन कचऱ्यावर प्रक्रिया होते का सर्व मुद्यांचा समावेश आवश्यक असतो.

मुंबई हागणदारीमुक्त शहर म्हणून यापूर्वी जाहीर झाले आहे. मात्र स्वच्छतागृहांची कमतरता हा मुंबईतील गंभीर प्रश्‍न बनला आहे. ३५ ते ५० नागरिक वापरतील अशा पद्धतीने मुंबईत सार्वजनिक शौचालयात एक शौचकुप बांधण्यात येते. प्रत्यक्षात त्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट वापर होतो. काही ठिकाणी २०० हून अधिक नागरीक एका शौचकुपाचा वापर करतात. त्याचा मोठा फटका पालिकेला बसला आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकार्यांनी दिली.

कचरा वर्गीकरणाचा फटका

ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरणाचे प्रमाण या सर्वेक्षणात मोजले जाते. मुंबईत अद्याप पूर्ण क्षमतेने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही. तसेच सर्व प्रकारच्या कचऱ्याचे पुरेसे वर्गीकरणही देखील होत नसल्याने त्याचा पालिकेच्या रेटिंगवर परिणाम झाला आहे.

मुंबईची घसरण (क्रमांकामध्ये)

२०१६ : १०

२०१७ : २९

२०१८ : १८

२०१९ : १९

२०२० : ०

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here