मुंबई: महानगराची जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख ७ तलावांपैकी आज (२० ऑगस्‍ट, २०२०) सायंकाळी ७.०५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे.

हा तलाव गतवर्षी म्‍हणजेच दिनांक २५ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍याआधी वर्ष २०१८ मध्‍ये १७ जुलै रोजी, वर्ष २०१७ मध्‍ये १८ जुलै रोजी तर त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच सन २०१६ मध्‍ये हा तलाव २ ऑगस्‍ट रोजी भरुन वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. आज सकाळपर्यंत सातही तलावातील जलसाठा हा १२ लाख ६२ हजार ११९ दशलक्ष लीटर्स इतका असून तो क्षमतेच्‍या ८७.२० टक्‍के एवढा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here