अमरावती: सध्याच्या युगात लग्न म्हणजे अत्यंत खर्चिक बाब. लग्नसोहळ्यात थाट, चमचमीत खाद्यपदार्थ आणि पाहुण्यांची अवू भगत करता करता सर्वसामान्य शेतकरी, शेतमजुर व हातमजुरी करणाऱ्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची होत होती. हीच परिस्थिती थांबवण्यासाठी अमरावती येथे नितीन कदम यांनी आज ४५ मुलींचे कन्यादान केले. या सर्वधर्म विवाह सोहळ्यात हातात संविधानाची प्रत, राष्ट्रगीत म्हणत ४५ वधू-वर विवाह बंधनात अडकले. या सोहळ्याची जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली.

जन्मत:च फोकोमेलिया आजाराने ग्रासले, परिस्थितीवर मात करत पठ्ठ्याने मैदान राखलं, वाचा नेमकं प्रकरण
अमरावती येथील संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक नितीन कदम आणि प्रवेश कदम हे पुढाकार घेऊन गोरगरीबांचे लग्न लावून दिले. आज अमरावती येथील जाधव पॅलेसमध्ये हा सर्वधर्मीय आंतरजातीय विवाह सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी साडी चोळी, अलंकार व नवरदेवाकडील पाहुण्यांना गोड जेवणाचा बेत आखत ४५ मुलींचे कन्यादान करण्यात आले.

भाजप – शिंदे गटाच्या वादानंतर ‘५० खोके आणि १०५ डोके’ अशा आशयाचे बॅनर

विशेष म्हणजे एकाच मांडवात हिंदू बौद्ध पद्धतीने विवाह पार पडला. याच मंडपात दिवाळीमध्ये मुस्लिम समाजाचा विवाह पार पडण्याची घोषणा सुद्धा झाली. एकीकडे एक आणि दोन मुलीच्या लग्नाचा विवाह खर्च झेपत नसताना नितीन कदम यांनी चक्क 45 मुलींची जबाबदारी घेत त्यांचे लग्न थाटामाटात लावून दिले. त्यामुळे हा विवाह सोहळा जिल्ह्याभरात चांगला चर्चेत आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here