वाचा:
सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासाला एका क्षणी मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असे वळण लागले होते. बिहारच्या पोलीस महासंचालकांनी या काळात अनेकदा वक्तव्ये केली होती. पाडे यांनी एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे मुंबई पोलिसांवर टीका केली होती. न्यायालयाच्या निकालानंतरही त्यांनी ‘न्याय की अन्याय पर जीत’ असं म्हटलं होतं. शिवाय, या प्रकरणातील एक संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याबद्दलही असभ्य भाषेत टीका केली होती. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून गुप्तेश्वर पांडे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. बिहारमधील गुन्ह्यांची उदाहरणे देऊन शिवसेनेनं काही प्रश्न उपस्थित केले होते.
वाचा:
शिवसेनेनंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी गुप्तेश्वर पांडे यांच्याबद्दल एक भविष्यवाणी केली आहे. ‘यदाकदाचित नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री झाले तर बिहारचे पोलीस महासंचालक हे तिथे नक्कीच गृहमंत्री असतील,’ असं आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हे ट्वीट करताना आव्हाड यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात गुप्तेश्वर पांडे हे भाजपच्या नेत्यांची भाषा बोलत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.