धीरज हे संशयी वृत्तीचे होते. डॉ. सुषमा यांच्यावर ते संशय घ्यायचे. त्यांनी सुषमा यांचा मोबाइल स्वत:च्या मोबाइलवर डायव्हर्ट करुन ठेवला होता. संशयातून दोघांमध्ये सतत वाद होत होते. मात्र दोघेही मुलांसमोर वाद घालत नव्हते. घराबाहेर अथवा कारमध्ये बसून ते वाद घालायचे, असेही कळते. सुषमा यांनी पती धीरज, मुलगा ध्रुव व मुलगी वण्या यांना जेवनातून गुंगीचे औषध दिले. तिघेही बेशुद्ध झाल्यानंतर डॉ. सुषमा यांनी इंजेक्शन देऊन त्यांना ठार मारले. त्यानंतर सुषमा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान धीरज यांना कोणतरी ब्लॅकमेल करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी या दिशेनही तपासाची चक्रे फिरवली. गुरुवारी या प्रकरणात कुटुंबातील कलहाची झालर समोर आली. रोज नवीन कारणे समोर येत असल्याने या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. चारही पथकाच्या चौकशी अहवालानंतरच या घटनेचे नेमके कारण समोर येईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
A big thank you for your article.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.