Edited by Vrushal Karmarkar | | Updated: 21 Jun 2023, 3:33 pm

Aashadhi Wari 2023: वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्र सरकराकडून वारकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. वारीमध्ये अनेक घटना घडतात. त्यात अनेक वारकरी आपला जीव गमावतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकराने हा निर्णय घेतला आहे.

 

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा
  • विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू
मुंबई: पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे.
३२ वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा, या मुस्लीम कुटुंबाचा धार्मिक वसा जोपासण्याचा प्रयत्न
वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

डोळ्यांचं पारणं फेडणारी अश्वांच्या दौड अन् वैष्णवाच्या मेळाव्यात पहिलं उभं रिंगण

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात. त्यात अनेक वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करताना सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here