Aashadhi Wari 2023: वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्र सरकराकडून वारकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. वारीमध्ये अनेक घटना घडतात. त्यात अनेक वारकरी आपला जीव गमावतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकराने हा निर्णय घेतला आहे.

हायलाइट्स:
- वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा
- विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू
वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.
वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात. त्यात अनेक वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करताना सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.