पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेनंतर ट्विट केले आहे. श्रीशैलम जलविद्युत संयंत्राला आग लागणे हे दुर्दैवी आहे. अशा दु:खद प्रसंगी माझ्या सहवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरच बरे होतील अशी मला आशा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
गुरुवारी रात्री १०.३० वाजता ही आग लागली. त्या वेळी एकूण १९ लोक कामावर होते. यां पैकी १० लोकांना वाचवण्यात यश आले असून एक विभागीय अभियंता, चार सहाय्यक अभियंते, दोन कनिष्ठ प्लांट अटंडंट आणि दोन इतर लोक या आगीत अडकले. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र ९ लोकांचा प्राण वाचवण्यात बचाव पथकाला अपयश आले. श्रीशैलम जलविद्युत संयंत्र तेलंगणमधील आंध्र प्रदेशच्या सीमेलगत आहे. तेथील आगीनंतरची परिस्थिती पाहता तातडीने NDRF ला देखील पाचारण करण्यात आले.
कृष्णा नदीवर निर्माण करण्यात आलेल्या हे पॉवर स्टेशन हैदराबादपासून सुमारे २०० किमी दूर आहे. हे पॉवर स्टेशन तेलंगण राज्य पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन (जेनको) तर्फे संचलित केले जाते. या संयंत्रात एकूण ६ भाग असून त्यांची एकूण क्षमता ९०० मेगावॅट वीज उत्पादन करण्याची आहे. इथे चांगला पाऊस झाल्यानंतर या संयंत्रात वीज निर्मितीचे काम जोरात सुरू होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
Thank you ever so for you article post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.