नागपूर : ‘मैं यहाँ का डॉन हू, यहाँ रहना हैं तो पाच हजार रुपये देना पडेगा, नही तो अंजाम बुरा होगा’, अशी धमकी देणाऱ्या युवकाला अजनी पोलिसांनी अटक केली.गौरव पंकज रगडे (वय २६) असे अटकेतील खंडणीखोराचे नाव असून त्याचा साथीदार अर्जुन ऊर्फ चिनी हा फरार आहे. संकेत जगदीश शंभरकर (वय १९) याने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.संकेत हा अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजीलालपेठ येथे राहतो. मंगळवारी सायंकाळी गौरव व अर्जुन त्याच्या घराजवळ आले. लाथ मारून दार उघडले. दोघेही घरात घुसले. संकेतच्या वडिलाला धक्काबुकी केली. संकेतने विरोध केला. ‘तू येथे कसा राहायला आला. मी येथील डॉन आहे. येथे राहायचे असेल तर पाच हजार रुपये खंडणी द्यावी लागेल अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी दिली. अर्जुनने चाकूचा धाक दाखवून संकेतकडून ५०० रुपये हिसकावले व दोघेही पसार झाले. यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. संकेतने अजनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गौरवला अटक केली.
संकेतने अजनी पोलीस ठाणे गाठत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दिलेल्या फिर्यादीवरून अजनी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर यांनी आरोपींविरुद्ध कलम ३८६, २९४, ३२३, ४५२, ५०६ (ब), उपकलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी गौरव व अर्जुन उर्फ चायनीज याला अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात आणखी गुन्हे दाखल असल्याची माहिती अजनी पोलिसांनी दिली.
पीडित संकेत शंभरकर हा रामदासपेठ येथील एका कॅफेमध्ये काम करतो. पूर्वी ते कौसल्यानगर येथे राहत होते.काही दिवसांपूर्वीच तो कुंजीलालपेठेत येथील ह्युमॅनिटीज शाळेजवळ वर्मा यांच्या घरात भाड्याने राहायला आला आहे.
संकेतने अजनी पोलीस ठाणे गाठत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दिलेल्या फिर्यादीवरून अजनी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर यांनी आरोपींविरुद्ध कलम ३८६, २९४, ३२३, ४५२, ५०६ (ब), उपकलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी गौरव व अर्जुन उर्फ चायनीज याला अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात आणखी गुन्हे दाखल असल्याची माहिती अजनी पोलिसांनी दिली.
पीडित संकेत शंभरकर हा रामदासपेठ येथील एका कॅफेमध्ये काम करतो. पूर्वी ते कौसल्यानगर येथे राहत होते.काही दिवसांपूर्वीच तो कुंजीलालपेठेत येथील ह्युमॅनिटीज शाळेजवळ वर्मा यांच्या घरात भाड्याने राहायला आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस कारवाई करुन गुन्हेगारांना जरब कशाप्रकारे बसवणार याकडे लक्ष लागलं आहे.