: औरंगाबाद जिल्ह्यातील ४२ ते ७५ वयोगटातील पाच करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या ६२२ झाली आहे.

चिकलठाणा येथील ७५ वर्षीय करोनाबाधित महिला रुग्णावर १५ ऑगस्टपासून घाटीत उपचार सुरू असताना रुग्णाचा काल दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला. हर्षनगर (लेबर कॉलनी) येथील ४२ वर्षीय बाधित महिला रुग्णावर १८ ऑगस्टपासून उपचार सुरू असताना तिचा गुरुवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता मृत्यू झाला. मयुर नगर (हर्सूल) येथील ४८ वर्षीय बाधित पुरुष रुग्णावर ३० जुलैपासून उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री साडेदहा वाजता त्याचाही मृत्यू झाला. चौधरी कॉलनी (चिकलठाणा) येथील ६० वर्षीय बाधित पुरुष रुग्णावर १० ऑगस्टपासून उपचार सुरू असताना त्याचाही गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता मृत्यू झाला. गंगापूर (जि. औरंगाबाद) येथील ७० वर्षीय बाधित पुरुष रुग्णावर ११ ऑगस्टपासून घाटीत उपचार सुरू होते व रुग्णाचा शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ४७०, तर जिल्ह्यात ६२२ बाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज सकाळी ११७ नवे बाधित आढळून आले. यामध्ये शहरातील ६५, तर ग्रामीण भागातील ५२ बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १९,८५१ झाली आहे. त्यापैकी १४,९२७ बाधित हे आतापर्यंत करोनामुक्त झाले असून, सध्या ४,३०७ बाधितांवर उपचार सुरू आहे. तर, आतापर्यंत ६१७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

शहर परिसरात ६५ बाधित

शहर परिसरातील नव्या बाधितांमध्ये कर्करोग रुग्णालय परिसर येथील १, नर्सिंग हॉस्टेल १, गजानन नगर १, प्रोझोन मॉल १, गणेश नगर, पडेगाव १, जाधववाडी १, दिल्ली गेट परिसर ४, हर्सूल १, कैसर कॉलनी १, सदगुरूकृपा सोसायटी, सिडको १, पडेगाव १, अहिंसा नगर २, व्यंकटेश नगर १, महेश नगर १, शहानूरवाडी १, एन-सात सिडको १, गुरूकृपा सोसायटी, ईटखेडा १, मनजित नगर २, केबीएच नर्सिंग हॉस्टेल २, देवडी बाजार, सिटी चौक १, कांचनवाडी १, शिवाजीनगर १, मयूर पार्क (1), सातारा गाव परिसर १, सदाशिव नगर १, विवेकानंद नगर १, पुंडलिक नगर १, नागेश्वरवाडी २, केएफसी कंपनी १, अंबिका नगर ४, मुकुंदवाडी १, विश्वभारती कॉलनी १, अमरप्रित हॉटेल १, जयभवानी नगर १, प्रताप नगर १, गुरूदत्त नगर ६, उल्कानगरी १, सावननगरी, गारखेडा परिसर २, खडकेश्वर, उदय कॉलनी १, क्रांती नगर ३, तर कैलास नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

ग्रामीण भागात ५२ बाधित

ग्रामीण भागातील नव्या बाधितांमध्ये बिडकीन येथील १, ओम वृंदावन, वाळूज २, वाळूज एमआयडीसी १, गंगापूर १, कावसान पैठण १, पिशोर, कन्नड १, पैठण १, गणेश नगर, रांजणगाव १, गुरूधानोरा, गंगापूर १, सिल्लोड १, वडोदबाजार, फुलंब्री १, विहामांडवा १, अंबिका नगर, विहामांडवा १, शहाजातपूर १, वडगाव १, बजाज नगर १, पारिजात नगर, म्हाडा कॉलनी १, खडकी तांडा १, नंदा तांडा १, ठाकूर मळा, रांजणगाव ७, कमलापूर फाटा ३, नांदूरढोक, वैजापूर ७, करमाड १, इंदिरा नगर, पैठण १, परदेशीपुरा, पैठण ५, गोदावरी कॉलनी, गंगापूर १, घोडेगाव, गंगापूर १, बाबरगाव, गंगापूर १, जीवनगंगा, वैजापूर १, खंडाळा १, महाराणा प्रताप रोड, वैजापूर १, वीरगाव, वैजापूर १, तर स्वामी समर्थ नगर, वैजापूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here