राज्य सरकार सर्व काही सुरू करत आहे. मॉल उघडण्यात आले, व्यवसायही सुरू झाले. त्यामुळे आता मंदिरे बंद ठेवणं योग्य नाही. मंदिरे उघडल्यास अर्थव्यवस्थेला हातभार लागेल आणि परिसरातील लोकांच्या हाताला पुन्हा काम मिळेल, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शिर्डी हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असं संस्थान आहे. शिर्डीत ऑनलाइन दर्शन सुविधेपासून ते सोयीसुविधा देणाऱ्या सर्व सेवा आहेत. गर्दी न होता मंदिर सुरू करणं शक्य आहे. यामुळेच ग्रामस्थांच्या वतीने मंदिर खुलं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार आहे. सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास कोर्टात जावं लागेल. शिर्डीचं सर्व अर्थकारण मंदिरावर अवलंबून आहे. केंद्रानेही नियमावलीनुसार तिरुपती आणि वैष्णोदेवी मंदिर खुलं करण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारनेही अशीच परवानगी द्यावी, अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली.
सुप्रीम कोर्टाची मुंबईतील तीन जैन मंदिरे उघडण्यास परवानगी
दरम्यान, एकीकडे राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी होत असताना सुप्रीम कोर्टाने मुंबईतील तीन जैन मंदिरे उघडण्याची परवानगी दिली आहे. पर्युषण पर्व काळात ही मंदिरे दोन दिवसांसाठी उघडली जाणार आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks so much for the blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.