मुंबई : जर तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे, तर तुम्ही ही बातमी नक्की वाचा. दिवस उलटत असतानाच आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. परंतु यावेळी हा घोटाळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या रतन टाटा यांनी उघड केला आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी क्रिप्टोमधील गुंतवणुकीच्या अटकळ दरम्यान आपली भूमिका स्पष्ट केली. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष मंगळवारी म्हणाले की त्यांचा कोणत्याही स्वरूपाच्या क्रिप्टोकरन्सीशी कोणताही संबंध नाही.

Simone Tata: रतन टाटांची सावत्र आई, पर्यटक म्हणून भारताला दिली भेट, उभी केली ४९००० कोटींची कंपनी
रतन टाटांचे क्रिप्टो गुंतवणुकीवर स्पष्टीकरण
टाटा समूहाचे अध्यक्षांनी गुंतवणुकीच्या दाव्यांवर सोशल मीडियावर अधिकृत विधान जारी केले. “मी नेटिझन्सना विनंती करतो की कृपया जागृत रहा. माझा कोणत्याही स्वरूपाच्या क्रिप्टोकरन्सीशी कोणताही संबंध नाही,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. पोस्टने पुढे नमूद केले आहे की क्रिप्टोशी त्याचा संबंध सांगणारे कोणतेही लेख किंवा जाहिराती पूर्णपणे “असत्य आणि नागरिकांना फसवण्यासाठी आहेत.”

आनंद महिंद्रही पडले बळी
दरम्यान, एखादा उद्योगपती खोट्या बातम्यांना बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा देखील अशा खोट्या बातम्यांना बळी पडले होते ज्यांनी दावा केला होता की क्रिप्टोकरन्सीमधील त्यांच्या गुंतवणूकीने “बँका घाबरले” आणि “तज्ञ आश्चर्यचकित” झाले आहेत. अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांना एक “संपत्ती पळवाट” सापडली आहे जी तीन ते चार महिन्यांत गुंतवणूकदारांना लक्षाधीश बनवू शकते.

Ratan Tata: ब्रिटीश राजघराण्याच्या पुरस्कार सोहळा टाटांनी टाळला, कारण ऐकूण प्रिन्स चार्ल्सने केला सलाम…
अशा अहवालानंतर महिंद्रा यांनी टाटांप्रमाणेच स्पष्टीकरण जारी केले आणि महिंद्रांनी निवेदनात ठळकपणे सांगितले की त्यांनी क्रिप्टोमध्ये एक रुपयाही गुंतवलेला नाही.

कोण आहेत आशिष देवरा? २१व्या वर्षी व्यवसाय सुरू केला आता ९० कोटींत घेतला टाटांशी संबंधित कंपनीचा ताबा
क्रिप्टोमधील गुंतवणूक
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ऑनलाइन घोटाळे, विशेषत: क्रिप्टोकरन्सीशी संबंधित दररोज वाढत आहेत. अलीकडच्या काळात व्हॉट्सॲप घोटाळाही समोर आला असून यामध्ये, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना नोकरीच्या ऑफरसह अनोळखी नंबरवरून कॉल येतात. या घोटाळ्यांमुळे देशभरातील अनेक भारतीयांनी आपल्या कष्टाची कमाई गमावली आहे. यानंतर, मेटा तसेच भारत सरकारने वापरकर्त्यांना सावधगिरी बाळगा आणि अशा कॉलला बळी पडू नका, असा इशाराही दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here