वृत्तसंस्था, नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत प्राप्तिकर विभागाने करदात्यांना ८८ हजार ६५२ कोटी रुपये रिफंड दिला आहे. याचा लाभ २४.६४ लाख करदात्यांना झाला आहे. या रिफंडमध्ये वैयक्तिक करदात्यांची संख्या २३.०५ कोटी असून त्यांना एकूण २८हजार १८० कोटी रुपये रिफंड देण्यात आला आहे.

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ या करविषयक मध्यवर्ती संस्थेने (सीबीडीटी) १ एप्रिलपासून करदात्यांना रिफंड देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये २३,०५,७२६ वैयक्तिक व १,५८,२८० कॉर्पोरेट करदाते यांना रिफंड देण्यात आला आहे. वैयक्तिक करदात्यांना ६० हजार ४७२ कोटी रुपये रिफंड मिळाला आहे.

करोना आणि लाॅकडाउनच्या पार्श्वभूमीवरअर्थ मंत्रालयाने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आणि कस्टमच्या करदात्यांचा
तातडीने देण्याचे आदेश दिले होते. यामुळे एक लाख व्यावसायिक आणि सुक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) दिलासा मिळणार आहे. वैयक्तिक करदाते आणि व्यावसायिकांना एकूण १८ हजार कोटींचा कर परतावा दिला जाणार होता.

करदात्यांना आयकर परताव्याची ताजी स्थिती जाणून घेता येणार आहे. प्राप्तिकर ई-फाइलिंग पोर्टल किंवा ‘एनएसडीएल’च्या संकेतस्थळावर करदात्यांना पॅन क्रमांक आणि मूल्यांकन वर्ष भरून माहिती मिळवता येईल. देशात करोना व्हायरसचा प्रभाव वाढत आहे. या संकटकाळात केंद्र सरकारने कर परतावे तातडीने देऊन सामान्य करदाते आणि व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सुमारे १४ लाख करदात्यांना फायदा होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here