कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न आहे. अशा वक्तव्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, राष्ट्रवादी हा तळ्यात-मळ्यातील पक्ष असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली, कोल्हापुरात विखे-पाटील पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवसा एक बोलतात आणि रात्री अनेकांच्या गाठीभेटी घेतात, त्यामुळे या पक्षांवरील विश्वासार्हता ढासळत चालली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वक्तव्य केले जातात मात्र तो बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फक्त फेसबुकवर दिसले, आघाडीच्या सरकार काळात राज्य मागे पडल्याची टीकाही विखे-पाटील यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादीचे नेते दबक्या आवाजात जे बोलतात, तेच मी जाहीरपणे सांगितलंय; फडणवीसांनी शरद पवारांना पुन्हा डिवचलं

राजू शेट्टी उसाकडून महसुलाकडे वळले…

राज्याच्या महसूल विभागात शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पैसे घेऊन बदल्या केल्या जातात असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता याची चौकशी व्हावी अशी मागणी ही शक्ती यांनी केली होती त्या प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, महसूल विभागातील या प्रकाराबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा प्रकार दाखवून द्यावा, यावर तात्काळ कारवाई केली जाईल मात्र ऊस आंदोलन सोडून राजू शेट्टी महसूल आंदोलनाकडे कसे वळले असा सवाल ही विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Pune News: दर्शना पवारची हत्या, पुण्यात मुलीवर कोयत्याने हल्ला; शरद पवारांचा थेट फडणवीसांवर निशाणा, म्हणाले…

गोकुळ दूध संघाच्या लेखापरीक्षात अनियमितता

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे लेखापरीक्षण सध्या सुरू आहे या लेखापरीक्षणात अनियमित आढळली असून याबाबत गोकुळ दूध संघाला खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. लेखापरीक्षणाचा अहवाल अजूनही राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही, अहवालानुसार लेखापरीक्षणाबाबत अनिमित्त आढळल्यास गोकुळ दूध संघावर कारवाई करण्याचे संकेत दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here