म. टा. प्रतिनिधी, पुणेः अहमदनगर येथील एका खूनाच्या गुन्ह्यात दहा वर्षापासून पोलिसांना गुंगारा आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी अहदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सर्फराज रज्जाक मणियार (वय ३६ ,रा. कोंढवा खुर्द, मुळ. माळीवाडा अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अहमदनगर येथे ऑगस्ट २०१० मध्ये आरोपीने त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने पुर्ववैमन्सातून सराईत गुन्हेगार अमित वाघमारे याचे अपहरण करून खून केला होता. याप्रकरणी अहमदनगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. फरार कालावधीत सर्फराजने कोंढव्यात वास्तव्य करून टुर्स अॅण्ड ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरू केला होता. गुन्हे शाखेचे पोलिस अभिलेखावरील गुन्हेगाराची माहिती तपासत असताना कर्मचारी गजानन सोनुने यांना माहिती मिळाली की, नगर येथे दहा वर्षापूर्वी झालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सर्फराज हा कोंढव्यातील काैसरबाग परिसरात येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून सर्फराजला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here