मुंबईः राज्यात आज १० हजारांहून अधिक नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६ लाखांच्या वर गेली आहे. तर गेल्या २४ तासांत २५८ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यात करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज तब्बल १० हजार ४४१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. आद नोंद झालेल्या रुग्णांमुळं राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६ लाख ८२ हजार ३८३ इतकी झाली आहे. त्यामुळं करोनाचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे. राज्यात सध्या विविध रुग्णालयांत १ लाख ७१ हजार ५४२ (Active patient) अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

वाचाः

राज्यात करोना रुग्णांचा आकडा वाढत असताना करोना मृतांचा आकडाही वाढत असल्यानं आरोग्य प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. आज २५८ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आत्तापर्यंत २२ हजार २५३ रुग्णांचा उपचारादरम्यान जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर ३. २६ टक्के इतका झाला आहे.

वाचाः

रिकव्हरी रेट

राज्यात आज ७ हजार १५७ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर, आत्तापर्यंत ४ लाख ८८ हजार २७१ जणांनी करोनाची झुंज यशस्वीरित्या जिंकली आहे. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट ७१. ५५ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३४ हजार ८२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तसंच, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here