आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) चा वापर करणारे क्वॉरंटाइनमध्ये असलेले ९९.६ टक्के रुग्ण संसर्गापासून मुक्त झाले, असा दावा राज्य सरकारने केला आहे. राज्य सरकारने आपल्या सादरीकरणाची माहिती माध्यमांना दिली. ‘आयुष अंतर्गत सुचविलेले उपाय रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरले आहेत. आयुष उपचाराच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी एक संशोधनही केले गेले होते, असं आरोग्य विभागानं म्हटलंय.
९९ टक्क्यांहून अधिक नागरिकांना लाभ झाला!
‘आयसोलेशन कालावधीत ३३, २६८ रुग्णांना आयुष औषधांचा फायदा झाला. यातील निम्म्या नागरिकांनी होमिओपॅथीकची औषधे घेतली’, असं राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितलं. गुजरातच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव जयंती रवी यांनी रविवारी माहिती दिली. आर्सेनिकम अल्बम-३० या औषधाच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास होता. कारण ज्या रुग्णांना आर्सेनिकम अल्बम-३० गोळ्या दिल्या गेल्या त्यापैकी ९९.६९ जण लवकरच करोनामुक्त झाले, असं ते म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
These are actually great ideas in concerning blogging.
I really like and appreciate your blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.